मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन। कोरोना महामारीमुळे देशातील असंघटित कामगार बेरोजगार झाल्याने मरणयातना भोगत आहेत. अशीच अवस्था सर्वच क्षेत्रात असताना लोकांच्या घरची धुणीभांडी काम करून आपला चरितार्थ चालणार्या घरकामगार महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. नाशिक मधील एका घरकामगार महिलेने घर मालकाला घर भाडे दिले नाही म्हणून या घर मालकाने त्या महिलेला जिवंत पेटून दिले. Nashik The landlord fired the woman for not paying the rent
नाशिक मध्ये राहत असलेली घरकाम करून आपल्या कुटुंबाचे कसेबसे पोट भरणारी घरकामगार “आयेशा” नावाची महिला लॉकडाऊन परिस्थितीमुळे घरमालकाला घर भाडे देऊ शकली नाही. घरकामगार “आयेशा” हिने घर भाडे दिले नाही म्हणून संतापलेल्या घरमालक आणि त्याचा नातेवाईक यांनी आयेशाला जिवंत पेटवून दिले. घरकामगार “आयेशा” जिवंत जळाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
लॉकडाऊन काळामध्ये घर कामगारांचे काम बंद पडले, रोजगार बुडाला, कुठललेही उत्पन्न नाही अशा परिस्थितीत घर कामगार, त्यांचे कुटुंब कसेबसे चालवीत असताना घर मालक त्यांच्याकडे भाड्यासाठी तगादा लावतात. अगोदरच त्रस्त असलेल्या घरकामगारांना घरभाडे देणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत केंद्र व राज्य सरकारने सरकारने राज्यातील घर कामगारांसह असंघटित कामगारांना थेट दरमहा १० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले पाहिजे. अन्यथा अशा प्रकारच्या घटना भविष्यात वाढतच राहतील यायची दाखल सरकारने तात्काळ घ्यावी. अशी मागणी सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.डी एल कराड आणि राज्य सरचिटणीस एड. एम एच शेख यांनी कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे केली आहे.
या परिस्थितीत केंद्र व राज्य सरकारने पुढे येऊन या वर्गाला थेट आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला पाहिजे. तसेच या सर्व कामगारांना केंद्र आणि राज्य सरकार यांनी दरमहा १० हजार रुपये आर्थिक सहाय्य केले पाहिजे अशी मागणी सर्व कामगार संघटनांनी सरकार कडे केली आहे.
तसेच घरकामगारांसाठी सेवा शर्ती लागू करणारा व किमान वेतन देणारा कायदा करावा, त्यांचे कल्याण मंडळ साठी कर्मचारी वर्ग देऊन सर्व घर कामगारांची नोंदणी करावी व त्यामार्फत कल्याणकारी योजना व सामाजिक सुरक्षा योजना लागू कराव्यात अशी मागणी कामगार संघटनांनी वेळोवेळी केली आहे .
मात्र केंद्र व राज्य सरकारने याबाबत कुठलीही पावले उचललेली नाहीत.याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही अशी नाराजी कामगारनेते डॉ. कराड यांनी व्यक्त केली आहे.
कामगार आत्महत्या करत आहेत
२४ मार्चच्या लाक डाऊन नंतर राज्यातील घरकामगार, बांधकाम मजूर ,असंघटित कामगार, रिक्षाचालक, सलून कारागीर, दुकाने कामगार टपरीधारक अशा असंघटित वर्गाला उत्पन्न बुडाल्याने अनेक हालअपेष्टांना तोंड द्यावे लागत आहे . या संघटित कामगार कारागिरांना या ३ महिन्यांमध्ये सरकारने कुठलीही थेट आर्थिक मदत न केल्यामुळे ते मरणयातना भोगत आहेत. हे कामगार हवालदिल झाले आहेत .घर भाडे कुठून द्यायचे, किराणा कसा भरायचा, दैनंदिन खर्च कसा भागवायचा असे अनेक प्रश्न त्यांच्या समोर आहेत. अशा परिस्थितीत घर मालकांनी तगादा लावल्यास बेघर व्हावे लागेल या भीतीने घर कामगार नैराश्यग्रस्त झाले आहेत. पुणे मुंबई अशा अनेक ठिकाणी हे असंघटित कामगार आत्महत्यां करत आहेत. अशी तक्रार कामगार नेते डॉ.डी एल कराड यांनी राज्य सरकारला केली आहे.
घर कामगाराना अजूनही कामावर प्रवेश बंदी
अजूनही घरकामगारांना कामावर बोलवण्यात येत नाही. अनेक सोसायट्यांमध्ये घरकामगारांना अद्यापही प्रवेश बंद आहे. सरकारने वेळोवेळी जाहीर करूनही या परिस्थितीत बदल होत नाही आणि या घरकामगार आणि असंघटित कामगार यांची उपासमार सुरूच आहे. अशी माहिती डॉ. कराड यांनी दिली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज