टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून सोलापूरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, सोलापूर यांनी आपत्ती व्यवस्थापन व भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम कायदा लागू केला आहे. असे असताना यशवंतनगर येथे रविवारी (ता. 12) लग्न सोहळ्यात सुमारे 100 ते 150 लोकांची गर्दी जमवण्यात आली होती. यामुळे यशवंतनगर येथील नववधू-वरासह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लग्न कार्यास गर्दी जमवुन नियमांचे उल्लंघन करुन धोकादायक परीस्थिती निर्माण केल्याच्या कारणावरुन शंकरनगर येथिल नवरा,नवरी,लग्न लावणारे भटजी, फोटोग्राफर,मंडप डेकोरेटर असे एकूण आठ जणांविरुध्द शंकरनगरचे तलाठी यांच्या फिर्यादीवरुन अकलुज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालाआहे.
याबाबद अकलुज पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार सविस्तर माहिती अशी की महाराष्ट्र शासनाने राज्यात कोरोना या विषाणुचा संसर्ग व प्रादुभाव रोखणेसाठी उपाययोजना म्हणून सोलापूर जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सोलापूर यांनी व्यवस्थापन समिती आधिनियम २००५ कलम ४३ भारतीय साथरोग नियंञण अधिनियम १८९७ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियंम १९५१ चे कलम ३७(३) अन्वये आदेश पारीत असताना रविवार दि.१२ जुलै रोजी शंकरनगर अकलुज ता माळशिरस येथे लग्न सोहळ्याचे आयोजन करुन सुमारे १०० ते १५० लोकांची गर्दी जमवण्यात आली होती.
गर्दी जमवण्यास मनाई आदेश असतानाही,गर्दी जमवुन मानवी जिवीतास धोकादायक असलेला संसर्ग पसरवण्याची संभव असण्याचे हयगयचे कृत्य केली म्हणुन शंकरनगरचे तलाठी यांनी अकलुज पोलीसात दिलेल्या फिर्यादीवरुन नवरा,नवरी लग्न लावणारे भटजी,फोटो काढणारे फोटोग्राफर,मंडप डेकोरेशनचे मालक आदीसह एकुन आठ जणांविरुध्द भा.द.वि.क.२८९,१८८आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लग्नाला गर्दी जमवल्याच्या कारणावरुन माळशिरस तालुक्यात पहीलाच गुन्हा दाखल झाल्याने चांगलीच भिती निर्माण झाली आहे.
पोलीस निरिक्षकांचे अहवान
लग्न कार्यास शासन नियमाप्रमाणे ५० पेक्षा अधिक लोकांची गर्दी जमवली तर गुन्हा दाखल होईल यांची नोंद घ्यावी.५० लोक जमली तरी सोशल डिस्टन्स ठेवणे,तोंडाला मास्क लावणे,परीसर सँनेटाईझ करणे आदी गोष्टीची गांभीर्याने दक्षता घेणे अवश्यक आहे.
या पुढे कोरोना विषाणुचा प्रादुभाव रोखण्यासाठी अकलुज पोलीस ठाणे हद्दीतील जागरुक नागरीकांनी दक्ष राहुन कोणत्याही कारणास्तव गर्दी जमत असल्यास तात्काळ अकलुज पोलीस स्टेशनला 02185222100 या नंबरवर कळवावे,माहीती देणाराचे नाव गुप्त ठेवले जाईल व गर्दी जमवणाऱ्यांनवर कारवाई केली जाईल.
– भगवानराव निंबाळकर (पोलीस निरीक्षक अकलुज पोलीस ठाणे)
It was expensive to crowd the wedding! Eight persons, including Navara, Navari and Bhatji, have been booked
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज