टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी सोलापूर यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 च्या 37(1) व (3) कलमान्वये जिल्ह्याच्या ग्रामीण हद्दीत दि.2 ऑगस्ट 2020 पर्यंत शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेश लागू केला आहे, असे जिल्हादंडाधिकारी सोलापूर यांनी कळविले आहे.
सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात ( पोलीसआयुक्तालय हद्द वगळून ) सर्वत्र शांतता , कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून 2 ऑगस्ट 2020 पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 ( 1 ) आणि 37 ( 3 ) आदेश अपर जिल्हादंडाधिकारी अजित देशमुख यांनी जारी केले आहेत.
या आदेशानुसार शस्त्रे , झेंडा लावलेली काठी किंवा शरीरास ईजा करण्याकरीता वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे , कोणताही ज्वालाग्राही अगर स्फोटक पदार्थ वाहून नेणे , व्यक्ती अगर त्यांची प्रेत यात्रा , प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक घोषणा करणे, असभ्य हावभाव करणे, ग्राम्य भाषा वापरणे , सभ्यता अगर निती विरुध्द निरनिराळया जाती जमातीच्या भावना दुखावल्या जातील.
त्यामुळे त्यांच्यात भांडणे बखेडे निर्माण होवून शांततेस बाधा होईल , सोंगे अगर चिन्हे कोणताही जिन्नस तयार करून त्याचा प्रसार करण्यास मनाई करण्यात येत आहे.
हा आदेश अत्यावश्यक सेवा , तसेच सरकारी नोकरांना त्यांची कर्तव्ये अधिकार बजाविताना उपरनिर्दीष्ठ वस्तू हाताळाव्या लागतात आणि ज्या व्यक्तींना जिल्हादंडाधिकारी , पोलीस अधिक्षक ( ग्रा ) , उपविभागीय दंडाधिकारी , उपविभागीय पोलीस अधिकारी , पोलीस निरीक्षक , दुय्यम पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या परवानगीस लागू होणार नाहीत.
—————————
???? राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 95 6161 7373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 95 6161 7373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज