टीम मंगळवेढा टाईम्स ।
आपली मानसिक प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी परमार्थाचे साधन असणार्या प्रवचनमाला सारखे प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करणे हे मनुष्याचे जीवनाचे कर्म,ज्ञान,भक्ति हे त्रिवेणी संगम आहे.
हा त्रिवेणी संगम गेल्या चार वर्षांपासून संतनगरी म्हणून ओळखले जाणार्या मंगळवेढा येथे स्व.सौ.लक्ष्मीबाई (नीलाई) बाजीराव कांळुगे यांचे स्मरणार्थ धनश्री परिवाचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे व प्रा.शोभाताई काळुंगे सुरू ठेवला आहे.
असे प्रतिपादन वारकरी संप्रदायातील संतश्रेष्ठ मानकोजी महाराज बोधले यांचे वंशज ह.भ.प. अॅड.जयवंत बोधले यांनी केले.
मंगळवेढा येथील रजपूत लॉन्स येथे स्व. सौ. लक्ष्मीबाई (नीलाई) बाजीराव कांळुगे यांचे स्मरणार्थ आयोजीत करण्यात आलेल्या धनश्री प्रवचनमाला या पाच दिवसीय प्रवचन मालेत पहिल्या दिवशी विवेचन करताना बोधले महाराज म्हणाले,
भक्ती हे एक असे साधन आहे की जे फल प्राप्ती नंतर ही शिल्लक राहते म्हणूनच ज्ञानपूर्व भक्ती व ज्ञानोत्तर भक्ती असा विचार गीतेमध्ये श्री कृष्णाने अर्जुनाला सांगितलेला आहे . भक्ती शब्दाला योग हा शब्द जोडला आहे.
भक्तीने परमात्म्याला जोडणे म्हणजे भक्तियोग प्रत्येकाचे साध्य हे एक असते परंतु त्यासाठी साधने अनेक असतात. ज्याप्रमाणे मडययाला मातीचा कंटाळा नसतो, कपड्याला तंतूंचा कंटाळा नसतो त्याचप्रमाणे माणसाने कर्माचा कंटाळा करु नये. ज्ञानापेक्षा, कर्मापेक्षा, योगापेक्षा भक्ती श्रेष्ठ होय भगवंतप्राप्ती म्हणजे भक्ती आणि भक्ती ही भगवंताच्या जवळची वाट आहे.
रामायणाचा विचार केला असता राम, लक्ष्मण व भरत या पात्रांचा सातत्याने उल्लेख होतो. मात्र पडद्याआड असलेला व अहंकाररूपी शत्रूचा नाश करणारा असा शत्रुघ्न रामाचा दास, आज्ञाधारक तसेच कोणत्याही गोष्टीचे मूळ शोधणारा वा कोणतीही अपेक्षा नसणारा असा तो शत्रुघ्न होता.
रामायणामध्ये चार बंधूंपैकी शत्रुघ्नचा फारसा विचार झाला नाहीख्र ज्यावेळी राम- लक्ष्मण चौदा वर्षे वनवासात होते.त्यावेळेस भरत हादेखील चौदा वर्षे अयोध्येशेजारील नंदीग्राममध्ये होता.अशा प्रसंगामध्ये 14 वर्षे अयोध्येचे राज्य ज्यांनी सांभाळले असा तो शत्रुघ्न होता.
वनवासाला गेलेल्या राम-लक्ष्मणाला राज्यगादीची अपेक्षा नळहती. त्याचप्रमाणे नंदीग्राममध्ये राहणार्या भरतला देखील नव्हती. परंतु राज्यगादी समोर दिसत असताना त्याची अपेक्षा नसलेला शत्रुघ्न होता असे महाराजांनी स्पष्ट केले.
या शत्रुघ्नचे विविध पैलू उघडून दाखवताना महाराज म्हणतात की, शत्रुघ्नने जो अहंकार जिंकला होता तसेच स्वत:चे मी पण त्याने कधीही रामायणात मिरवले नाही.
म्हणून शत्रुघ्नचा विचार हा रामाच्या दासाचा दास म्हणजे राम-भरत-शत्रुघ्न असा होतो. नावातच शत्रुघ्न असलेला तो आज्ञाधारक होता. खर्या अर्थाने भक्तीयोग जाणून घेण्यासाठी त्याची व्याख्या समजली पाहिजे. याबाबत दुसर्या सत्रात विवेचन होणार आहे.
धनश्री परिवाराचे प्रमुख प्रा.शिवाजीराव काळुंगे, यावेळी मनोहर कलुबर्मे, प्रा.शोभाताई काळुंगे, डॉ. राजलक्ष्मी काळुंगे – गायकवाड, युवराज गडदे, प्रभाकर कलुबर्मे, बसवराज मोगले, दत्तात्रय नागणे, प्रकाश काळुंगे, राकेश गायकवाड, धनश्री महिला पतसंस्थेच्या सरव्यवस्थापिका सुनिता सावंत, धनश्री मल्टीस्टेटचे सरव्यवस्थापक रमेश फडतरे यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज