टीम मंगळवेढा टाईम्स ।
शेतकऱ्यांच्या महाविकास आघाडीकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या; पण त्या अपेक्षांना तडे गेले असून , कर्जमाफीचा एक मुद्दा सोडला तर कुठल्याच गोष्टी शेतकऱ्यांच्या मनासारख्या झालेल्या नाहीत.
घोटाळ्यात गुरफटून गेलेल्या सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडला असून, नेत्यांना आवरा, अन्यथा आघाडीचा डोलारा ढासळण्यास वेळ लागणार नाही, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते , माजी खासदार राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
शेट्टी या पत्रात म्हणतात, अनेक नाट्यमय घडामोडींनंतर महाविकास आघाडीची निर्मिती झाली. समाजवादी पक्ष, बहुजन विकास आघाडी, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी पक्ष, लोकभारती आदी घटक पक्षांना सत्तेतील नेते कवडीचीही किंमत देत नाहीत.
आघाडीच्या नेत्यांची बैठक आतापर्यंत घेतलेली नाही. महापूर व अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत जाहीर करून वाऱ्यावर सोडले गेले.
राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महाजेनको, महापारेषण, महावितरण या कंपन्यांची एक दिवस एसटी महामंडळासारखी परिस्थिती होईल.
नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाची नुसतीच घोषणा केली.
स्वर्गीय एन.डी.पाटील व स्वर्गीय गणपतराव देशमुख यांना यापूर्वी आघाडीशी फारकत घ्यावी लागली होती, तशीच वेळ आमच्यावर आली आहे.(स्रोत:लोकमत)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज