टीम मंगळवेढा टाईम्स ।
तावशी गाव हे क्रांतिकारकांचे गाव आहे. शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या वर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मला एकदाच संधी द्या. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत ऊसबील मिळवून देण्यासाठी, महिलांना आर्थिक बाबतीत सक्षम करण्यासाठी मला संधी द्या.भावनिक्तते पेक्षा काम करणाऱ्या उमेदवारास मतदान करा असे आवाहन सौ.शैलाताई गोडसे यांनी तावशी ग्रामस्थाना केले.
पुढे बोलताना शैला गोडसे म्हणाल्या की, काय म्हणून खांबावर प्रस्थापितांच्या विरोधात जनतेने बळ द्यावे शेतकऱ्यांची कामगारांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या या कारखानदारी चालवणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी आज जोरावर आमदार होऊ पाहत आहेत अशा मस्तवाल स्वार्थी अशा लोकांना जनतेने खड्यासारखे बाजूला करावे शेतकऱ्याची व कामगारांचे आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी मला एक वेळ विधानसभेमध्ये जाण्याची संधी द्यावी असे आव्हान शैलाताई गोडसे यांनी शिरगाव या गावी जनतेला केले
“पायताण हातात घेऊन शेतकऱ्यानी थकीत ऊसबील मागावे”…प्रभाकर भैय्या देशमुख
पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात सौ.शैलाताई गोडसे यांच्या प्रचार सभेत बोलताना प्रभाकर देशमुख म्हणाले या दोन्ही तालुक्यातील साखर कारखानदारांनी आपल्या कष्टकरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ऊसाचे अद्यापही थकीत ऊसबील दिले नाही. अशा लोकांना शेतकऱ्यानी हातात पायताण घेऊन जाब विचारावा.कष्टाचे पैसे टाक आणि मगच गावात पाऊल ठेव असे शेतकऱ्यांनी स्पष्ट शब्दात सांगावे.
शेतकऱ्यांची,कामगारांची आर्थिक कोंडी करणाऱ्या या कारखानदारांना या निवडणुकीत पराभूत करा असे आवाहन प्रभाकर देशमुख यांनी शिरगाव येथील मतदार बंधूना केले.
शेतकऱ्यांच्या जीवावर साखर कारखाने काढणारे त्या शेतकऱ्यांचे ऊसबील थकवतात.कामगारांचे वेतन देत नाहीत. अशा मस्तवाल कारखानदारांना शेतकऱ्यांनी गावामध्ये येऊ देऊ नये.
साखर ही शेतकऱ्यांची आहे या साखरेवर कोट्यवधी रुपयांचे. कर्ज उचलली जातात. परंतु त्या शेतकऱ्यांची ऊसबील ते देत नाहीत.अशी दयनिय अवस्था करणाऱ्या कारखानदाराना या निवडणुकीत पराभूत करा.
शेतकऱ्यांच्या साठी,कामगारांच्या साठी लढा देणाऱ्या सौ.शैलाताई गोडसेना विजयी करा असे आवाहन प्रभाकर देशमुख यांनी तावशी येथील ग्रामस्थांना केले
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज