टीम मंगळवेढा टाईम्स ।
लोकांनी करोना विषयक नियम पाळले नाही तर लाॅकडाऊन शिवाय पर्याय नाही’, असं वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.
राज्यातील वाढत्या करोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी साडेबाराच्या दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यात बैठक पार पडली. बैठकीनंतर टोपे यांनी लाॅकडाऊनसंदर्भात माहिती दिलीय.
यावेळी बोलताना टोपे म्हणाले, राज्यात दररोज नवीन करोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत चालली आहे. करोना रुग्णसंख्येत वाढ होणे म्हणजे आपण लाॅकडाऊनच्या दिशेने जातोय. आणखी दोन-तीन दिवस आढावा घेतला जाणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राज्यातील जनतेला होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांनी करोनाचे नियम पाळण्याबाबत जनतेला आवाहन केले आहे. तसेच जनतेला आवाहन करूनही प्रतिसाद मिळत नसेल तर राज्य सरकारला कठोर निर्णय घ्यावा लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
तसेच आपापली जबाबदारी लक्षात घेऊन शांतपणे होळी साजरी करा. नियमांचे पालन करा. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाटेत अधिक रुग्णसंख्या वाढताना दिसते आहे.
सध्या कुटुंबच्या कुटुंब बाधित आढळतात ही चिंताजनक बाब आहे. जनतेने करोनाचे नियम पाळले तर नक्कीच मोठा फरक पडेल असेही पवार यांनी म्हटले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज