टीम मंगळवेढा टाईम्स ।
आमदार भारत भालके यांची रात्री बाराच्या सुमारास प्राणज्योत मालवली.आज सकाळी त्यांचे पार्थिव पुण्याहून थेट सरकोली ला आणण्यात येणार आहे.त्यांना आदरांजली म्हणून मंगळवेढा तालुका आज बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी संघाच्या वतीने घेण्यात आला आहे.
आज दुपारी बारा ते चार वाजेपर्यंत भालके नानांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल त्यानंतर दुपारी 4 वाजता सरकोली येथील त्यांच्या शेतातच अंत्यसंस्कार विधी पार पडतील , अशी माहिती मिळाली.
भारत भालके यांना कोरोनाचा प्रादुर्भाव नव्हता त्यामुळे त्यांचा मृतदेह घेऊन जाण्यास डॉक्टरांनी परवानगी दिली आहे.
भारत भालके यांना 30 ऑक्टोबरला कोरोना झाला होता परंतु तेरा दिवसांच्या निर्धारित कालावधीनंतर या विषाणूंचा प्रादुर्भाव कमी होतो , तथापि त्यात सहा दिवस येथे अलगीकरनामध्ये राहिल्यानंतर त्यांना डेंग्यू झाला असल्याचे समोर आले आहे.
त्यांना डेंग्यूचा ताप आला म्हणून त्यांनी पुन्हा पुण्यामध्ये जाऊन रूबी हॉल क्लिनिक मध्ये तपासणीचा निर्णय घेतला. त्या वेळीही त्यांनी सुरुवातीचे दोन दिवस थेट रुग्णालयात दाखल न होता रुबी हॉल चेच काही ccomodation फ्लॅट असतात येथे राहणे पसंत केले.
परंतु श्वासालाही त्रास होऊ लागला म्हणून शेवटी त्यांनी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी त्यांना डेंग्यूच्या बरोबरीने निमोनिया चाही त्रास जाणवू लागला.
शिवाय छातीतील कफ कमी होत नव्हता त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. सलग सहा ते सात दिवस हे उपचार सुरू असताना त्यांची ऑक्सिजन लेवल हळूहळू कमी होत गेली तसेच दोन्ही किडन्या पूर्ण क्षमतेने कार्यरत नसल्यामुळे ते उपचारांना प्रतिसाद देऊ शकत नव्हते.
हळूहळू पल्स कमी लागू लागले आणि ऑक्सिजन लेवल ही वाढत नव्हती म्हणून त्यांना परवा दिवशी दुपारी साडेपाच वाजता व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले.परंतु उपचारास प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
डॉक्टर ग्रॅंड यांनी सांगितले की,पोस्ट कोविड डिसीज मुळे त्यांना अधिक त्रास झाला.शेवटच्या दहा दिवसात त्यांच्यावर डॉक्टर घाडगे , डॉक्टर पंकज गायकवाड यांनी सातत्याने संपर्क ठेवून चर्चा केली तसेच पुण्यातील डॉक्टरांशी संवाद साधला पर्यंत सर्व प्रयत्न निष्फळ ठरले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज