सोलापूर-मंगळवेढा रोडवरील बेगमपुर येथिल भिमानदीवरील पुल नूकताच पाण्याखाली गेल्याने साेलापुरकडे जाणारी सर्व वाहतूक थांबवन्यात आलीय.तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी खबरदारी म्हणून सकाळीच पाहणी करून आदेश दिले होते.
तसेच नदीकाठावरील हजाराे हेक्टर क्षेत्रातील ऊस पिकात पाणी घूसल्याने ऊस पिके आडवी पडली आहेत.पाण्याचा प्रवाह माेठा आसल्याने नदी काठावरील शेती पंप पाण्यात बूडून अर्थीक नूकसान झाले आहे.
पिकाचे पंचनामे करून मदत मिऴावी अशि नुकसान ग्रस्त शेतकर्यांची मागणी आहे. Due to water on Begumpur bridge, the traffic going to Salelapur was stopped by Paelis
मंगऴवेढा आगारातून सूटनाऱ्या साेलापुर,पंढरपुर,सांगाेला,पुणे,मार्गावर धावनार्या बस बंद करन्यात आल्याचे आगार सुत्राकडून सांगन्यात आले.
मंगळवेढा बसस्थानकावर कर्नाटक राज्यातील महिला प्रवासी वर्ग बसेस अभावी आडकुन पडला आहे. Due to water on Begumpur bridge, the traffic going to Salelapur was stopped by Paelis
भीमा नदी काठी राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची तालुका प्रशासनाने तयारी सुरू केली आहे तालुक्यातील बठाण, उचेठाण, ब्रह्मपुरी, माचनूर, तामदर्डी, अरळी, सिद्धापूर, तांडोर, या सात गावाजवळ पुराचे पाणी पोहचले आहे भीमा नदी पात्राबाहेर पडल्याने नदी काठची हजारो एकर जमीन पाण्याखाली गेली आहे.
तामदर्दी गावाचा संपर्क तुटला आहे तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी नदीकाठच्या गावांना भेटी देऊन पूर परिस्थितीचा आढावा घेऊन नदीकाठी वस्ती करून राहणाऱ्या ना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना दिल्या आहेत या मार्गावर रहाटेवाडी मार्गे गावात पाणी येत असल्याने बोराळे ते माचनूर , रहाटेवाडी ते बोराळे हा मार्ग बंद झाले आहेत.
सन २००६ व २००७ या साली सलग दोन वेळा महापूर आल्याने बेगमपूर पूलावर जवळपास तीन फूट पाणी होते. सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू असून अजून दि १७ पर्यत मुसळधार पावसाचा अंदाज सांगितला असल्याने विसर्ग वाढला जाणार आहे त्यामुळे माचनूर-बेगमपूरच्या पूलावरही सकाळी ९.३० पर्यत पाणी येण्याची शक्यता तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी वर्तवले आहे.
भिमा नदीकाठावर उचेठाण, बठाण, ब्रम्हपुरी, माचणूर, तामदर्डी, रहाटेवाडी, तांडोर, अरळी, सिध्दापूर ही गावे असून पूराचा पहिला फटका तामदर्डी गावाला बॅक वाटरमुळे बसला. तामदर्डी गावाला पाण्याने वेढल्यानंतर बेटासारखी आवस्था निर्माण झाली आहे.
ही परस्थिती निर्माण होवू नये यासाठी रहाटेवाडी ते तामदर्डी दरम्यान मच्छीपुलाची गेल्या अनेक वर्षापासून ग्रामस्थांची मागणी आहे. मात्र अद्यापही पूर्ण झाली नाही. परिणामी महापूर आल्यानंतर गावाला संकटाशी सामना करावा लागतो आहे. तामदर्डी नंतर दुसरा फटका उचेठाण गावाला ओढयातून पाणी आल्यामुळे पाण्याने गाव वेडले जाते.
गावात जाण्यायेण्यासाठी होढीचा वापर वेळप्रसंगी करावा लागतो. इतर गावे उंचावर असल्यामुळे शक्यतो या गावांना पाण्याचा फटका बसत नाही मात्र शेतीचे क्षेत्र पाण्याखाली जात असल्यामुळे शेतकर्यांच्या पिकाचे मोठे आर्थिक नुकसान होते.
तहसिलदार स्वप्निल रावडे यांनी नदीकाठावरील गावांना तलाठयांच्या समवेत भेटी देवून नागरीकांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच तलाठी व सर्कल यांना निवाशी राहण्याच्या सुचना करण्यात आल्या. ग्रामस्थांना खबरदारी म्हणून पुराच्या वाहत्या पाण्यात प्रवेश करू नये असे आवाहन तहसिलदार रावडे यांनी केले आहे.
नदीकाठावर शेतीच्या सिंचनासाठी मोठया प्रमाणात विद्युत मोटारी बसविल्या आहेत. नदीला पाण्याचा विसर्ग वाढत असल्याने कालपासून शेतकर्यांची मोटारी , पाईप काढण्यासाठी लगबग सुरू होती. प्रशासनाकडून नदीकाठावरील शेतकर्यांना सावधानतेचा इशारा या पूर्वी दिल्याने मोटारी भिजून शेतकर्यांचे होणारेे नुकसान टळले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज