मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोविड – १९ विषाणूची आपत्ती निवारणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या पीएम केअर्स फंडा ला रिलायन्स उद्योग समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी ५00 कोटी रुपयांची मदत दिली आहे. याशिवाय महाराष्ट्र आणि गुजरात सरकारलाही प्रत्येकी ५ कोटी रुपये देण्याची घोषणा अंबानी यांनी केली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रिजच्या वतीने एक निवेदन जारी करून या मदतीची घोषणा करण्यात आली आहे . निवेदनात म्हटले आहे की,कोरोना विषाणूविरोधातील लढ्यासाठी ‘ पीएम केअर्स फंडा ‘ ला ‘ रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेड ‘ कडून ( आरआयएल ) 400 कोटींची मदत देण्यात येत आहे . या लढ्यासाठी देश तयार , सुरक्षित , कनेक्टेड आणि प्रेरित राहावा , तसेच देशाचा पुरवठा कायम राहावा यासाठी आरआयएल सातत्याने प्रयत्नशील आहे . रिलायन्स परिवाराची शक्ती आम्ही । देशसेवेत आधीच लावली आहे.
मुकेश अंबानी यांनी सांगितले की , भारत कोरोना विषाणूविरोधातील लढाई आज ना उद्या जिंकणारच आहे. रिलायन्स समूहाची टीम या संकटकाळी देशासोबत असून , ही लढाई जिंकण्यासाठी काहीही करण्यास तयार आहे. रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक नीता अंबानी यांनी सांगितले की , देश कोविड – १९ विरुद्धच्या लढाईत एक झाला आहे . रिलायन्स फाऊंडेशन आमच्या देशबांधवांसोबत आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज