टीम मंगळवेढा टाईम्स । महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले श्री विठ्ठल – रुक्मिणीचे मंदिर कोरोनामुळे गेल्या साडेपाच महिन्यापासून बंद असलेले विठ्ठल मंदिर भाविकांना दर्शनासाठी तातडीने उघडावे; अन्यथा कोणत्याही परिस्थितीत वारकऱ्यांसोबत आंदोलन केले जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेळीच लक्ष घालून मंदिर उघडावे, अशी मागणी करत, वंचित बहुजन आघाडी आणि विश्व वारकरी सेना व विविध वारकरी संघटना आपल्या आंदोलनावर ठाम आहेत, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रवक्ते तथा सो.म.न नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी व्यक्त केली.
लॉकडाउन पासून पंढरपूचे श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर बंद आहे. मंदिर दर्शनासाठी पुन्हा खुले करावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी व विश्व वारकरी सेनेने केली आहे. याच मागणीसाठी 31 ऑगस्ट रोजी विठ्ठल मंदिरासमोर अँड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली लाखो वारकरी आंदोलन करणार आहेत.त्या पार्श्र्वभूमीवर मंगळवेढा येथील सोलापूर रोडवरील नवनाथ महाराज मठ येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते.
चंदनशिवे म्हणाले, लॉकडाउनमुळे गेल्या सहा महिन्यांपासून पंढरपूरचे विठ्ठल- रुक्मिणी मंदिर बंद आहे. बंदमुळे येथील व्यापारी आणि छोटे व्यावसायिक देशोधडीला लागले आहेत.
राज्यात दारूची दुकाने आणि मॉल उघडण्यास सरकारने विनाअट परवानगी दिली आहे; परंतु धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी दिली जात नाही. गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेली मंदिरे भाविकांसाठी खुली करावीत, या मागणीसाठी येत्या 31 ऑगस्ट रोजी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली विविध वारकरी संघटनांच्या वतीने पंढरपुरात आंदोलन केले जाणार आहे.
आंदोलनाला विविध वारकरी संघटनांनी पाठिंबा दिला आहे. या आंदोलनामध्ये राज्यभरातील सुमारे एक लाख वारकरी आणि भाविक सहभागी होणार आहेत. याबाबत चर्चा करण्यासाठी काल जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावलेल्या बैठकीवर आम्ही बहिष्कार टाकला आहे. आता ही आमची निकराची लढाई आहे. आता थेट मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल.असे मत व्यक्त केले.
सदर आंदोलनाला अखिल भाविक वारकरी मंडळाचे सोलापूर जिल्हा सह अध्यक्ष ज्ञानेश्वर भगरे यांनी अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह,भ प सुधाकर इंगळे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पाठिंबा असल्याचे सांगितले.
यावेळी अखिल भाविक वारकरी मंडळाचे सह जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर भगरे, नवनाथ महाराज मठाचे मठाधिपती बंडोपंत हेटकळे महाराज, जिल्हा निरीक्षक बबन शिंदे, वंचित चे जिल्हा महासचिव धनाजी सरवदे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक माने ,तालुकाध्यक्ष वैभव भंडारे ,शहराध्यक्ष सोमनाथ ढावरे, जनहित शेतकरी संघटनेचे जिल्हा युवाअध्यक्ष रघुनाथ चव्हाण, परमेश्वर शेजाळ, भारत शिंदे, सिद्धार्थ लोकरे,ब्रह्मदेव वाघमारे, समाधान राजवर्धन,अनिल सोनवणे ,बाळू वाघमारे, आप्पा बरकडे अंकुश शेंबडे ,सतीश लोकरे तसेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ ढावरे यांनी केले तर प्रास्ताविक अशोक माने यांनी केले तर उपस्थितांचे आभार अनिल सोनवले यांनी मानले.
बहुसंख्येने वारकरी आंदोलनात सहभागी होणार : ज्ञानेश्वर भगरे
करोना संसर्गामुळे गेल्या चार पाच महिन्यापासून राज्यात लॉकडाऊन सुरू आहे याचा फटका सर्वांना बसला आहे. राज्यात मिशन बिगिन अंतर्गत अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले असेल तरी धार्मिक स्थळांना आणि सण- उत्सवांना तितकासा दिलासा मिळाला नाही यंदा आषाढीवारी प्रतिकात्मकरित्या साजरी करण्यात आली आषाढी याञेदिवशी पंढरपुरात वारकऱ्यांना प्रवेशबंदी करण्यात आली होती.त्यामुळे समस्त वारकरी संप्रदाय वर्ग नाराज आहे.तरी ३१ रोजी पंढरपूचे श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर प्रवेश आंदोलनास अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प सुधाकर इंगळे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली बहुसंख्येने वारकरी आंदोलनात सहभागी होणार.
-ज्ञानेश्वर भगरे
सहजिल्हाध्यक्ष, अखिल.भाविक.वारकरी मंडळ.सोलापूर
Vitthal temple should be opened immediately for darshan, otherwise there will be intense agitation: Anand Chandanshive
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज