टीम मंगळवेढा टाईम्स ।
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघ केल्याप्रकरणी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील पाच आडत व्यापाऱ्यांवर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी सकाळी आठच्या सुमारास ही – कारवाई केली आहे.
मारुती हरी काळे (रा.कासेगाव, ता.पंढरपूर) , ओंकार विश्वास भोसले (रा.गोपाळपूर, ता.पंढरपूर), सोमनाथ राजाराम बनसोडे (रा.देगाव, ता. मंगळवेढा), बिलाल शेखलाल बागवान (रा.मंगळवेढा) व अण्णासाहेब एकनाथ बोदाडे (रा.मंगळवेढा) यांचा गुन्हा दाखल झालेल्या आडत व्यापाऱ्यांत समावेश आहे.
याप्रकरणी हेडकॉन्स्टेबल कृष्णा हणमंत जाधव यांनी फिर्याद दिली. संशयित आडत व्यापाऱ्यांनी आपल्या गाळ्यात विनामास्क गर्दी जमवून जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे व कोरोना नियमांचे उल्लंघन केले.
याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध भा.दं.वि. कलम १८८, २६९, २७० आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ब, साथीचे रोग प्रतिबंधक कायदा कलम २, ३ , ४ नुसार कारवाई करण्यात आली. पोलिस कर्मचारी तुकाराम कोळी तपास करीत आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवेढा पोलिसांनी केला ५२ हजार रु . दंड वसूल
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवेढा पोलिसांनी १२९ जणांवर कारवाई करून ५२ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला आहे . ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्याची माहिती माहिती पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे यांनी दिली.
मंगळवेढा विनाकारण विनामास्क फिरणाऱ्या ६८ नागरिकांवर केसेस करून ३४ हजार रुपये दंड वसूल केला आहे. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये विनाकारण फिरणारे लोकांवर ६८/६९ प्रमाणे तीघांवर कारवाई करून त्यांची वाहने जप्त केली आहेत.
निर्धारित वेळेनंतर अस्थापना सुरू ठेवलेल्या दोघांकडून २००० हजार रुपयांचा दंड आकारला आहे. सार्वजनिक ठिकाणी थुकलेल्या ४९ जणांकडून ९८०० रुपये दंड आकारण्यात आला आहे.
सोशल डिस्टंनसिंगचे पालन न केलेल्या १० जणांवर कारवाई करून १००० रुपये दंड केला आहे. कलम १८८ प्रमाणे पाच जणांवर गुन्हे दाखल केले असून आपत्ती अधिनियमामधील तरतुदीनूसार हे दंड आकारण्यात आलेले आहेत. अशी माहिती पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे यांनी दिली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज