समाधान फुगारे । मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन लॉक डाऊनच्या कालावधीत सोलापूर जिल्ह्यातील पोलीसांनी ताब्यात घेतलेली हजारो वाहने दि.3 मे पासून परत देण्यात येणार आहेत .कागदपत्रांची पूतर्ता केल्यानंतर किमान दंडात्मक कारवाई करुन वाहने ताब्यात दिली जाणार आहेत. याबाबतची माहिती पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी दिली.
कोरोना या संसर्गजन्य विषाणूंचा प्रार्दुभाव कमी करण्यासाठी/रोखण्यासाठी प्रशासनाकडून संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. सोलापूर ग्रामीण जिल्हयात कोरोनाविषाणु संसर्गास प्रतिबंध करणेकामी,संचारबंदी दरम्यान विना कारण प्रवास करणाऱ्या वाहनचालकांची वाहने, मोटार वाहन कायदयाअंतर्गते ताब्यात घेण्यात आलेली आहेत.
पोलीस ठाणेकडून अशा प्रकारे ताब्यात घेतलेली वाहने सोडताना गैरप्रकार होऊ शकतात. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दि. 3 मे पासुन लॉकडाउन दरम्यान पोलीस ठाणे येथे मोटार वाहन कायदयाअंतर्गत ताब्यात घेतलेली वाहने सोडताना पुढीलप्रमाणे कार्यवाही करणेबाबतचे आदेश सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना दिले आहेत.
वाहनांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात यावी. ताब्यात घेतलेल्या वाहनांवर मोटार वाहन कायदयाप्रमाणे योग्य ती दंडात्मक कारवाई करावी. संबंधीत वाहन चालकाकडून “आम्ही संचारबंदी दरम्यान विनाकारण रस्त्यावर परत फिरणार नाही” असे प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात यावे.
मोटार वाहन कायदा कलम २०७प्रमाणे ताब्यात घेतलेली वाहने ही उपप्रादेशीक परिवहन कार्यालयाकडुन दंडात्मक कार्यवाही झाल्यानंतर सोडण्यात यावी.सदरची वाहने सोडताना पोलीसाकडुन कोणताही गैरप्रकार होणार नाही याबाबतची दक्षता घेण्यात यावी.
तसेच लॉकडाउन दरम्यान ताब्यात घेतलेली वाहने सोडताना पोलीसांकडुन गैरप्रकार होत असल्यास त्याबाबतची तक्रारsp.solapur.r@gmail.com व sp.solapur.r@mahapolice.gov.in या मेल आयडीवर कररण्यात यावी. असे आवाहन पोलीस अधीक्षक मनोज पाटील व अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी केले आहे.
——————
ब्रेकिंग व नवनवीन ताज्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज