टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढ्याच्या ग्रामीण भागातून १६ वर्षीय व १७ वर्षीय अशा दोन मुलींना अज्ञात कारणावरुन फूस लावून पळवून नेण्याचा प्रकार घडला असून,
या प्रकरणी दोन अज्ञाताविरुध्द गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, या अपहरणाच्या घटनेमुळे पालकवर्गातून चिंता वाढली आहे.
पहिल्या घटनेत २ डिसेंबर रोजी अरळी येथे शेतातील ऊस तोडणीचे काम सुरु असून यातील फिर्यादी हे मराठवाड्यातील असून ते ऊस तोडणीसाठी येथे आले आहेत.
दि.३ रोजी रात्री १२.३० वाजता उसाने भरलेला ट्रक कारखान्याला पाठवून जेवणखान करुन सर्व कुटूंब कोपीमध्ये झोपी गेले होते. सकाळी ६ वाजता
फिर्यादीची पत्नी ऊसतोडीसाठी उठल्यावर सदर १७ वर्षीय मुलगी ही कोपीमध्ये दिसून आली नाही. तिचा अन्यत्र सर्व शोध घेतला, मात्र ती मिळून आली नसल्याने अज्ञात कारणावरुन कोणीतरी फूस लावून पळवून नेले असल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली आहे.
दुसऱ्या घटनेत ३ डिसेंबर रोजी रात्री कुटुंबातील सर्वजण जेवणखान करुन ११ वाजता झोपी गेले. पहाटे चार वाजता फिर्यादी जागे झाल्यावर १६ वर्षीय मुलगी घरात दिसून आली नाही.
तिचा घराशेजारी, नातेवाईकांकडे शोध घेतला, मात्र ती मिळून आली नाही. अज्ञात कारणाने फूस लावून पळवून नेल्याची खात्री पटल्याने तशी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज