मंगळवेढा टाईम्स ब्युरो : तानाजी गोरड
देशातील शेतकरी आंदोलन जगभरात पसरत आहे शेतकरी वाचवायचा असेल तर शेतकर्यांच्या विरोधातील विधेयक हटवलेच पाहिजे अशी धारणा आत्ता देशातील शेतकर्यांची आहे. मोदी सरकार च्या या निर्णयाला कॅनेडा, बार्झील, दुबई, आदी राष्ट्रामधुन अनिवासी भारतीयांनी विरोध दर्शवला आहे मात्र गेल्या दोन दिवसांपासून शेतकरी आंदोलनावर कंगना सह काही लोक शेतकरी आंदोलनावर टिका करत आहेत.
मराठी अभिनेता किरण माने यांनी आपल्या फेसबुक वरुन कंगनासह शेतकरी आंदोलनवर टिका करण्यार्यानां चांगलंच सुनावलं आहे.
अस्सल मराठी मातीतील अभिनेता किरण माने शेतकर्यांच्याप्रश्नी नेहमीच धावुन येत असतो.
काय आहे पोस्ट:
व्हय ! माझ्या शहरातल्या दोस्ता.. कंगनाच्या भावा, कष्ट तू सुद्धा करतोस रं… मी नाय कुठं म्हंतूय? पन कसं हाय म्हायतीय का माझ्या सोन्या, तू केलेल्या कष्टाचा तुला पुरेपुर मोबदला मिळतो रं… हमखास ! खनखन वाजवून पगार घेतोस तू दरमहा !! माझ्या बळीराजाचा-शेतकर्याचा असा ‘हक्काचा इनकम’ नसतो !!!
किरण मानेचा एक डायलाॅग तू , तुझी ती कंगना आन् तिची बाजू घेनार्या पायचाटू-शेळपट-बुळग्या-सुमार दर्जाच्या कलाकारांना मेंदूत कोरून ठेवायला सांग :
“कष्ट करनं आन् ‘कष्टात जगनं’ या लै लै लैS फरक असतो गड्याहो”
‘व्यापारी’ आन् ‘शेतकरी’ ह्यातला फरकबी समजून घ्या चोंग्यांनो… शेतीमाल विकनार्या कुठल्या व्यापार्यानं कधी आत्महत्या केलेली ऐकलीय का??? त्यो कशाला आंदोलनं करंल? उलट या काळ्या कृषीकायद्याच्या जोरावर तर दलालांचे बंगले होतील, दारात गाड्या येतील..अधिकार्यांच्या घरी सोन्याची बिस्कीटं येतील.. मंत्र्यासंत्र्यांच्या दहा पिढ्या ऐश करत बसून खातील.. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ‘त्या’ दोन मोठ्या उद्योगपतींच्या संपत्तीत अब्जावधींची भर पडेल !
ते जाऊदे रं चोच्या, तुझ्या अकलेच्या पलीकडच्या हायेत या गोष्टी. तू ज्या वरनभातावर साजूक तुपाची धार सोडून मोठ्या आनंदानं वरपतोस ना, ते सगळं त्या शेतकर्याच्या कष्टातूनच तुझ्या घरी आलेलं असतं.. तुझी लाडकी कंगना पार्ट्या झोडताना जी दारू पिते ना, ती दारू बी त्याच्या शेतातल्या धान्यापास्नंच तयार झालेली असती… तुमचे पिताश्री जो लाखालाखाचा सूट घालतात, त्या सुटाचं कापडबी त्या शेतकर्याच्या शेतातल्या कापसापास्नंच तयार होतं !
माझा शेतकरी प्रत्येक हंगामात स्वत:ला मातीत गाडून घेतो… पुन्हा-पुन्हा उगवून येतो ! रक्ताचं पानी करुन पिक वाढवतो.. जोपासतो..मोठ्ठं करतो.. पन त्याच्या कणसाला टप्पोरं दाणं येत्यात – झाडाला फळं लगाडत्यात तवाच नेमकी ती फळं आन् धान्य परदेशातनं आयात व्हतं… माल टेम्पोत भरुन यार्डात येतो तवाच नेमकं व्यापारी भाव ढासळवत्यात !
बळीराजा सुखासुखी आत्महत्या आन् आंदोलनं करत नाय हे लक्षात घ्या बावळटांनो आन् आपली गटारतोंडं गप ठेवा.
काॅर्पोरेट शेतकर्यांना गब्बर करू पहाणारे, आणि खर्याखुर्या बळीराजाला देशोधडीला लावू पहाणारे कृषीविषयक काळे कायदे रद्द व्हावेत आणि किमान हमीभावाचा कायदा पास व्हावा, यासाठी शेतकर्यांच्या दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाला एक ‘शेतकरी पुत्र’ म्हणून माझा संपूर्ण पाठिंबा !-किरण माने
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज