टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोना संसर्ग हा जिल्हा मध्यवर्ती कारागृहात झाला आहे. यापुढे हा संसर्ग रोखण्यासाठी कारागृहातील इतर कैद्यांना जामीनावर सोडण्यात यावे अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष शाम कदम यांनी निवेदनाव्दारे मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
सध्या सोलापूर शहर कोरोनाच्या विळख्यात अडकला आहे.याचा मोठा संसर्ग हा जिल्हा मध्यवर्ती कारागृहात झाला आहे.कारागृहातील कैदी,आरोपी असे जवळपास ५० बाधित रुग्ण आढळले आहेत.हा आकडा वाढतच जाणार आहे.याचा ताण जेल प्रशासनाला पडत आहे.
कारागृहाची क्षमता कीत आहे आणि कैदी तिप्पट आहेत.आताच्या फिजीकल डिस्टन्स नियमाने वीस पट कैदी आहेत.यातील अनेक आरोपी वृध्द आहेत.काही आरोपी दोन तीन वर्षापासून कैद आहेत.तर काही कैदी अशक्त आहेत.हा संसर्ग रोखण्यासाठी कच्च्या कैदयांना वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करावे.अन्यथा मोठा अनर्थ होईल त्यामुळे संसर्ग टाळावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष शाम कदम यांनी केली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज