टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील पाणी प्रश्न सोडवणूक अनुषंगाने आंधळगाव व इतर १० गावांना वरदायीनी ठरणारी आंधळगाव प्रादेशिक नळ पाणी पुरवठा त्वरित मार्गी लावून सुरु करावी अशी मागणी पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आ.समाधान आवताडे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग अंतर्गत कार्यकारी अभियंता सोलापूर यांचेकडे पत्राद्वारे केली आहे.
आ. समाधान आवताडे यांनी पत्रात म्हटले आहे की, मतदारसंघातील आंधळगाव, लक्ष्मी दहिवडी , महमदाबाद ( शे ) , अकोला , घरनिकी , मल्लेवाडी , देगांव , ढवळस , धर्मगांव कचरेवाडी व मारापूर अशा एकूण ११ गावांना सदर पाणी पुरवठा योजनेचा लाभ होणार आहे.
वरील गावांमध्ये उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई भासत असल्यामुळे या योजनेचा प्रश्न प्राधान्यक्रमाने मार्गी लावावा असेही आ.समाधान आवताडे यांनी म्हटले आहे.
सदर गावाची ही योजना ११ नोव्हेंबर २००६ पासून बंद आहे. तदनंतर कार्यान्वित झालेली योजना ३० सप्टेंबर २०१ ९ पासून पुनःश्च बंद झाली आहे. तेव्हापासून रखडलेल्या या योजनेअभावी सदर ११ गावांमध्ये पाण्याची खूप समस्या निर्माण होत असल्यामुळे ही योजना सुरु करावी अशी आग्रही मागणी आ.आवताडे यांनी केली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज