टीम मंगळवेढा टाईम्स।
कै. सौ. सोजरबाई सुकदेव दत्तू यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आज मंगळवार दि.२३ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता प्रमुख मान्यवरांच्या हस्ते कै.दत्तू यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात येणार आहे.
सकाळी १० वाजता कारखाना रोड वरील किशोर दत्तू मळा येथे युवा किर्तनकार ह.भ.प. शिवलीला पाटील यांचे किर्तन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती किशोर दत्तू यांनी दिली.
या किर्तनासाठी पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी अध्यात्मिक बाल वारकरी संस्थेचे ह.भ.प. नितीन आदमाने व बालवारकरी यांची साथसंगत लाभणार आहे.
किशोर दत्तू मळा कारखाना रोड येथे सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन दत्तू परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवणार : अजित पवार
लोकसभा निवडणुकीत महायुतीमधील सत्ताधारी तिन्ही पक्ष एकत्र लढलो. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवायच्या आहेत. त्यामुळे महापालिका, नगरपालिका,
जिल्हा परिषद, तालुका पंचायत्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या ठिकाणी कामे व्यवस्थित करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.
गुरुपौर्णिमेनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पुणे शहर विधानसभा अध्यक्ष, माजी नगरसेवक सर्व सेल कार्यकारिणी पदाधिकारी मेळावा केसरी वाडा येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते मार्गदर्शनपर बोलत होते.
यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शक्य तिथे स्वबळावर लढवणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केले. पुणे-कल्याणीनगर अपघात प्रकरणात पुण्याचे वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांची तीन-चार वेळा चौकशी झाली; पण त्यातून काही समोर आले नाही.
त्यामुळे उगाच बदनामी केली जाते. लोकप्रतिनिधी म्हणून मदत करायला लोक फोन करतात तर जावे लागते. माध्यमांपासून सावध राहा. पुण्याला बदनामी करणाऱ्या घटना मधल्या काळात घडल्या. त्या सर्वांवर कारवाई केली आहे.
अतिक्रमण करून कोण धंदे करणार असेल, तर चालणार नाही. नियमावलीत भेदभाव नाही. सर्वांना सारखाच न्याय देत आहोत. त्यामुळे बदनामी करू नये. असे कृत्य खपवून घेतले जाणार नाही, असे अजित पवार म्हणाले.
लोकसभेत विरोधकांनी ‘४०० ‘पार झाल्यावर संविधान बदलले जाणार आहे, असा चुकीचा नरेटिव्ह सेट केला. यामुळे एससी, एसटी आदिवासी समाज यांना भीती वाटू लागली. त्यामुळे लोकसभेला फटका बसला. सूर्य-चंद्र आहे तोवर संविधान बदलता येणार नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज