टीम मंगळवेढा टाईम्स ।
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील गेल्या तीस वर्षात कोणतीही महत्त्वाचा प्रश्न सुटला नसून मतदार संघातील तरूण व बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी माझी उमेदवारी असल्याचे प्रतिपादन अपक्ष उमेदवार सिध्देश्वर आवताडे यांनी केले आहे.
शेतकरी, कामगारांना न्याय देण्यासाठीच आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.अपक्ष उमेदवार सिद्धेश्वर आवताडे यांनी माचनूर (ता. मंगळवेढा) येथील सिध्देश्वर मंदिरापासून मंगळवारी शेतकरी, कार्यकर्ते रॅली काढत आपल्या प्रचाराला सुरूवात केली आहे.
व्यासपीठावर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बबनराव आवताडे,दामाजी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष विठ्ठल घुले,नंदकुमार पडवळे,दामाजी कारखान्याचे संचालक लक्ष्मण नरुटे, पंचायत समितीचे सदस्य सूर्यकांत ढोणे, पंचायत समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब शिंदे, अँड.दत्तात्रय तोडकरी, महाराष्ट्र केसरी समाधान घोडके,सार्वजनिक शिवजयंतीचे अध्यक्ष प्रशांत गायकवाड,उद्योजक विजय भोसले,युवराज घुले,संभाजी ब्रिगेडचे समाधान क्षीरसागर,माजी सदस्य संजय पवार जनार्धन डोरले, चोखामेळानगरचे उपसरपंच सुहास पवार,आनंदा पाटील, चनबसू येणपे,अँड.इरफान सय्यद, अँड.गुरुराज बुरुकुल आदीजन उपस्थित होते.
सिध्देश्वर आवताडे पुढे बोलताना म्हणाले की,पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची निवडणूक गेली १२ वर्ष मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावच्या उपसा सिंचन योजनेच्या प्रश्नावर लढविली जात आहे. हा प्रश्न व्यवस्थित शासन दरबारी मांडून सोडविणे शक्य असले तरी विद्यमान लोकप्रतिनिधींनी ते चुकीच्या पद्धतीने मांडून लाभार्थी गावातील शेतकरी, नागरिकांची दिशाभूल केली आहे.
त्यामुळेच हक्काच्या पाण्यापासून नागरिक वंचित आहेत. इतर प्रश्न न सोडविता त्याचे फक्त भांडवल केल्यामुळे लोक हक्काच्या योजनांपासून वंचित असून या योजनांना आपले प्रथम प्राधान्य असल्याचे सिध्देश्वर आवताडे यांनी सांगितले.
तसेच आपली उमेदवारी सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगारांच्या न्याय हक्कासाठी आहे. मागील काळामध्ये सहकारी साखर कारखानदारी स्वत:ची खाजगी मालमत्ता समजून शेतकरी, कामगारांची देणी न देता त्याच पैशांवर निवडणुका जिंकायच्या व शेतकरी, कामगारांची पिळवणूक करायची, ही प्रथा रूढ झाली आहे.
बाळासाहेब शिंदे बोलताना म्हणाले की, सिध्देश्वर आवताडे यांच्यावर असलेल्या विश्वासावर मी त्यांच्या सोबत गेलो आहे. ग्रामीण भागातील येणाऱ्या नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सिध्देश्वर आवताडे हे चोवीस तास उपलब्ध असतात.
गेल्या अनेक वर्षांपासून एक लोकप्रतिनिधी पाणी देतो म्हणतोय एक प्रतिनिधी पाणी आणतो म्हणतोय पण आजपर्यंत येथील शेतकऱ्यांना पाणी काय मिळाले नाही.शेती संदर्भात शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी सिद्धेश्वर आवताडे यांना विजयी केले पाहिजे असे त्यांनी सांगितले.
समाधान क्षिरसागर बोलताना म्हणाले की, सर्वानी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.पण सिद्धेश्वर आवताडे यांनी मोठ्या ताकतीने प्रचाराची सुरुवात केली आहे. एका बाजूला पैशावर तोलणारी माणसे आहेत.तर दुसऱ्या बाजूला सर्व जनता व कार्यकर्ते सोबत असलेली माणसे आहेत
सिद्धेश्वर आवताडे व बबनराव आवताडे यांनी आजपर्यंत अनेक जणांना आधार दिला आहे. गेल्या अनेक वर्षापासून फक्त विकासाचे राजकारण केले आहे.येणाऱ्या काळात आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर सिध्देश्वर आवताडे यांच्याशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले.
युवराज घुले बोलताना म्हणाले की, या निवडणुकीत आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर सिद्धेश्वर आवताडे यांना आपण विजय केले पाहिजे.इतर पक्षांनी ही निवडणूक प्रतेष्ठेची केली आहे. आपण त्यांना त्यांची जागा दाखवून नवीन तरुण उमेदवार निवडून दिला पाहिजे. सर्वांसाठी वेळ देणारा व त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रथम प्रधान्ये देणारा तरुण आपण विधानसभेत पाठवा असे आवाहन घुले यांनी केले.
दरम्यान याप्रसंगी अपक्ष उमेदवार किशोर सीताराम जाधव यांनी आपला पाठिंबा सिद्धेश्वर आवताडे यांना दिला आहे. याप्रसंगी जमीर इनामदार, संग्राम माने सरकार,दिलीप खांडेकर, रणजित जगताप,गणेश जोरवर,ज्ञानेश्वर बाबर, यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.
कार्यक्रमाचे प्रस्तावित अँड.दत्तात्रय तोडकरी यांनी केले सूत्रसंचालन भारत मुढे तर आभार सागर आवताडे यांनी मानले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज