टीम मंगळवेढा टाईम्स।
वाढत्या विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी व भारनियमन टाळण्यासाठी महावितरणवर खुल्या बाजारातून महागडी वीज घेण्याची वेळ आली आहे.
तर दुसरीकडे अनेक आकडेबहाद्दर बिनदिक्कतपणे विजेची चोरी करतात; त्यांच्या वाढीव भारामुळे रोहित्र जळण्याचे प्रमाणही वाढत आहे.
परिणामी, महावितरणने या आकडे बहाद्दरांना अद्दल घडविण्यासाठी धडक मोहीम हाती घेतली असून, एका दिवसात सोलापूर जिल्ह्यासह बारामती परिमंडळातील हजारो आकडे काढून त्यांच्या केबल व मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत.
तापमानात जशी वाढ होईल तशी राज्याची विजेची मागणी वाढत आहे गतवर्षीच्या तुलनेत यंदा मार्च महिन्यापासून महावितरणची मागणी २४५०० मेगावॅटच्या पुढे गेली आहे.
ही मागणी टिकून असली तरी यात वाढ होतच आहे. खुल्या बाजारात विजेचे दर १२ रुपयांपर्यंत आहेत. ही महागडी वीज घ्यायची तर त्याचा बोजा पुन्हा ग्राहकांवर येणार आहे.
ती कमीत कमी घेता यावी यासाठी यंत्रणेवरील अनधिकृत भार कमी करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी महावितरणला दिले आहेत.
आकडे बहाद्दरांवर कारवाई करताना ज्या ११ केव्ही वाहिन्यांचा करंट १०० अॅम्पीअरच्या पुढे आहे अशा ३९८ न्या बारामती परिमंडलात आहेत. त्यांना टार्गेट करून सकाळपासूनच धडक मोहीम हाती घेतली होती.
यामध्ये अनधिकृतपणे जोडलेले कृषीपंप, त्याचे केबल, स्टार्टर आदी जप्त केले आहे. घरगुती व इतर ग्राहकांचे आकडे सुद्धा काढले जात आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज