टीम मंगळवेढा टाईम्स ।
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण आलेल्या मंडळाकडून घेण्यात बारावींच्या परीक्षाचा निकाल बुधवार ८ जून म्हणजेच आज दुपारी जाहीर केला जाणार आहे.
विद्यार्थी दुपारी १ वाजता www.mahahsscboard.in सह अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहू शकणार आहेत. बारावीची परीक्षा यंदा ४ मार्च ते ७ एप्रिलदरम्यान घेण्यात आली होती.
यंदा सोलापुरातून जवळपास साठ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. विद्यार्थी ‘ व्हॉटस्अॅप दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे दहावी आणि बारावींच्या विद्यार्थ्यांना मागील वर्षांच्या गुणांच्या आधारावर गुण देण्यात आले होते.
यंदा विद्यार्थ्यांनी शिक्षण ऑनलाईनमधून पूर्ण केले , पण परीक्षा मात्र ऑफलाईन पद्धतीने दिली. त्यामुळे यंदाच्या निकालाची विद्यार्थ्यांसोबत पालकांनाही मात्र उत्सकता आहे.
असा पाहा निकाल
विद्यार्थ्यांनी प्रथम महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत वेबसाइट www.mahahsscboard.in जा . त्यानंतर होम पेजवर दिलेल्या ” इयत्ता १२ वी निकाल २०२२ ” या लिंकवर क्लिक करा.
आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल, इथे तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि जन्मतारीख टाकून सबमिट करा. तुमचा १२ वी निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
‘या‘ आहेत महत्त्वाच्या तारखा
ज्या विद्यार्थ्यांना आपल्याला मिळालेल्या गुणांबाबत शंका असेल, ते पुन्हा पेपर रिचेकींगसाठी अर्ज करु शकतात. गुणपडताळणीसाठी 10 ते 20 जून, उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी 10 ते 29 जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे.
दरम्यान, महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन अर्ज करण्यासोबत या अर्जासाठीचं शुल्कही ऑनलाईन पद्धतीनं विद्यार्थ्यांना भरता येऊ शकेल.
पेपर रिचेकींगसाठी 10 जूनपासून ते 20 जूनपर्यंत अर्ज करण्याची मुदत
उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी 10 ते 29 जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत
अर्ज करण्यासाठीचं शुल्कही ऑनलाईन भरता येणार, नापास विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा घेतली जाणार,
पुरवणी परीक्षेसाठी 10 जूनपासूनच अर्जाची प्रक्रिया सुरु होणार
अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना http:verification.mh-hsc.ac.in या लिंकवर जावं लागेल. आधी छायाप्रत घेणं महत्त्वाचं
उत्तर पत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी आधी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणं आवश्यक असतं. छायापत्र मिळाल्यापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत मुनर्मूल्यांकनासाठी विद्यार्थी अर्ज करु शकतात.
ज्या विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षेत यश येणार नाही, त्यांच्यासाठी पुन्हा एकदा परीक्षेला बसण्याची संधी देण्यात येणार आहे. अशा विद्यार्थ्यांना जुलै-ऑगस्ट महिन्यात पुरवणी परीक्षा घेतली जाईल. परुवणी परीक्षेसाठीदेखील 10 जूनपासून ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरुन घेतले जाणार आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज