टीम मंगळवेढा टाईम्स । गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं हवामानात वेगानं बदल होत आहेत. 19 ते 20 मे रोजी विदर्भातील काही भागांमध्ये तापमानाचा पारा वाढला होता. तर प. बंगाल, ओडिसामध्ये अम्फान चक्रीवादळानं थैमान घातलं आहे. महाराष्ट्रामध्ये गेले काही दिवस हवामानात बदल बदल होत नाही. मे महिन्याच्या सुरुवातीच्या राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस पडला होता. आता शेवटच्या आठवड्यात विदर्भात उष्णतेची लाट येईल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
येत्या 3 दिवसात विदर्भवासीयांना उन्हाचे तीव्र चटके बसणार आहेत. सरासरी कमाल तापमानापेक्षा पारा जास्त राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहेय तर मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातही 40 अंश सेल्सियसपर्यंत तापमान राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. 23 ते 25 मेपर्यंत विदर्भात उष्णतेची लाट येणार असल्यानं हवामना विभागाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्यात मागच्या काही आठवड्यांमध्ये दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा तसेच कोकण भागांमध्ये अवकाळी पाऊस पडल्याने मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान झालं होतं. त्यानंतर अचानक तापमानात वाढ झाली होती. जळगाव, परभणी, नांदेड, सोलापूर, औरंगाबाद या शहरात गेल्या काही दिवसात कमाल तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्यावर गेला तर काही शहरात 43, 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
महाराष्ट्रासोबतच देशातील अनेक ठिकाणी तापमान कमालीचं वाढण्याची शक्यता आहे. पश्चिम राजस्थान, पश्चिम गुजरात, सौराष्ट्र, मध्य प्रदेश काही भागात ही येत्या तीन दिवसात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रामधील बरोबरच देशात देखील उष्णतेची लाट पुढील तीन दिवस दिसणार आहे राजस्थानमध्ये श्चिम राजस्थान भाग तसेच पश्चिम गुजरात सौराष्ट्र पश्चिम किनारपट्टी कर्नाटक या भागांमध्ये सुद्धा उष्णतेची लाट दिसणार असून सरासरीपेक्षा अधिक तापमान वाढेल मध्यप्रदेश मध्ये देखील उष्णतेची लाट याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पश्चिम बंगाल, कोलकाता आणि ओडिशा इथे मात्र अम्फान चक्रीवादळामुळे गेल्या 4 दिवसांत मोठ्या प्रमात नुकसान झालं आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज