टीम मंगळवेढा टाईम्स ।
महाराष्ट्राच्या राजकारणातील आदर्श , सुसंस्कृत, कर्तृत्ववान असणारे दुष्काळी भागातील शेतीला पाणी मिळावे, यासाठी गेली ५० वर्षे झटणारे व ११ वेळा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य असणारे भाई गणपतराव देशमुख यांना राज्य शासनाने महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करावा , अशी मागणी मंगळवेढा खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पेनूर, ता . मोहोळ येथील शेतकरी कुटुंबातील शासनाकडून जन्मलेल्या गणपतराव देशमुख यांनी कोणताही देशमुख राजकारणाचा वारसा नसताना एकाच पक्षाशी एकनिष्ठ राहून त्यांनी सांगोला येथील जनतेची ५५ वर्षे सेवा केली.
सांगोला हा धनगर-मराठा प्रभुत्व असणारा तालुका परंतु आबासाहेबांनी जातीय राजकारणाचा कधीही थारा दिला नाही. प्रत्येकाचे काम करत सर्वांना चांगल्या कामासाठी मदत केली. व संसदीय लोकशाहीचा संकेत त्यांनी कायम पाळला.
सांगोला , आटपाडी , मंगळवेढा यासारख्या दुष्काळी तालुक्यांना पाणी मिळावे. म्हणून त्यांनी गेली ५० वर्षे चळवळ उभी करून शेतकऱ्यांच्या शेतात पाणी आणले गोरगरिबांना न्याय आणि आधार देण्याचे काम केले.
त्यांच्या विधानसभेतील सेवेची गिनीज बुकात देखील नोंद झाली असून , राजकारणात राहून कायम समाजकारण करणाऱ्या भविष्यात त्यांच्या कार्याचा आदर्श भावी पिढीला घेता यावा,
यासाठी या थोर व्यक्तीचा महाराष्ट्र शासनाकडून सन्मान होणे गरजेचे असून, गणपतराव देशमुख यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करावा. अशी मागणी आवताडे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना केली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज