टीम मंगळवेढा टाईम्स । खडकवासला धरण साखळीत शनिवारी दुपारनंतर पावसाचा जोर वाढला. खडकवासला धरणातील येवा 17 हजार क्यूसेकपेक्षा जास्त होता. म्हणून शनिवारी रात्री 16 हजार 247 क्यूसेक पाणी मुठा नदीत सोडण्यात येत आहे. शनिवारी रात्री पावसाचा जोर वाढल्यास धरणातील विसर्ग वाढविणार असे खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी सांगितले. Khadakwasla raised Visarga from the dam, 11 gates opened by two feet
दरम्यान, आज संध्याकाळी पाच वाजता चार ही धरणात मिळून सुमारे 80 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मागील शनिवार आठ ऑगस्ट रोजी या चार धरणात मिळून 57.96 टक्के पाणीसाठा होता.
आठ दिवसांत आठ टीएमसीची वाढ
आज चार ही धरणात मिळून 23.19 टीएमसी पाणी जमा झाले आहे. मागील शनिवार आठ ऑगस्ट रोजी या चार धरणात मिळून 16.89 टीएमसी होते. अशा 5.950 टीएमसी पाणी वाढले तर बुधवार पासून धरणात विसर्ग सुरू केला आहे. आज अखेर दोन टीएमसी पाणी मुठा नदीत सोडून उजनी धरणात जमा होते.
अशा प्रकारे आठ टीएमसी पाणी जमा झाले. असे खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी सांगितले.
शनिवारी रात्री आठ वाजता 11 दरवाजे सुमारे पाऊणे दोन फुटाने उघडले असून त्यातून 16 हजार 247 क्यूसेकचा विसर्ग मुठा नदीत सोडला जात आहे. दरम्यान, शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजता सुमारे 14 हजार क्यूसेकचा येवा होता. शनिवारी सकाळ 11 वाजेपर्यंत कायम होता. अकरा वाजता 11 हजार 207 क्यूसेक पर्यत कमी केला.
परंतु, दुपारनंतर पाऊस वाढल्याने संध्याकाळी साडे अकरा क्यूसेक चा सुमारे 17 हजार क्यूसेक येवा येत आहे. शनिवारी संध्याकाळी पाच वाजता मागील अकरा तासात खडकवासला 25,पानशेत 61, वरसगाव 60, टेमघर येथे 50 मिलिमीटर पाऊस झाला होता. दरम्यान, पुलावरून पाणी जात असल्याने उत्तमनगर पोलिसांनी पहाटे मुठा नदीवरील शिवणे- नांदेड पूल वाहतुकीस बंद केला.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज