टीम मंगळवेढा टाईम्स । सध्या मोसमी पावसाने जोरदार आगमन केल्याने मुंबई, कोल्हापूर आणि राज्यात अशा अनेक ठिकाणी पाणी साचले आणि जनजीवन विस्कळीत झाले. काही ठिकाणी तर अगदी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. आता पुन्हा २-३ दिवसांची विश्रांती घेतल्यावर पाऊस मुसळधार बरसण्याची चिन्हे आहेत. It will rain in ‘Ya’ districts of the state in next 3 days
औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये 15 आणि 16 ऑगस्टला पावसाच्या हलक्या सरी तर काही भागांत मुसळधार पाऊस होऊ शकतो. तर कोकणात पुढील चार दिवस जोरदार ते अति जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाकडून सांगण्यात आली आहे.
मुंबईत तर पाऊस अजूनही थांबलेला नाही. येत्या काही तासात पालघर आणि कोकण किनारपट्टीसह दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही भागांत अति मुसळधार ते मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज कुलाबा वेधशाळेन वर्तवला आहे.
दरम्यान मुंबई आणि उपनगर भागात होत असलेल्या सततच्या आणि बेभरोसी पावसामुळे ‘घराबाहेर पडताना पावसाचा अंदाज घेऊनच बाहेर पडा’ असा ईशारा देण्यात आला होता. अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचा तसेच समुद्रकिनारे तसेच पाणी भरलेल्या ठिकाणापासून लांब राहाण्याचेही सांगितले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज