टीम मंगळवेढा टाईम्स।
उत्कृष्ट तपास कार्य केल्याबद्दल उल्हासननगर गुन्हे शाखा घटक ४ येथील पोलीस निरीक्षक मनोहर नरसप्पा पाटील यांना १५ ऑगस्ट रोजी सर्वोत्कृष्ठ तपासी अधिकारी म्हणून केंद्रीय गृह मंत्री यांच्याहस्ते गौरविण्यात येणार आहे.
पोलीस निरीक्षक मनोहर पाटील यांनी अल्पवयीन मुलगा कु.रंजन (वय ७) हा गावदेवी मंदिर परिसरात खेळत असतांना अनोळखी इसमाने अज्ञात कारणांस्तव त्यास पळवुन नेले बाबत फिर्याद दिली होती.
सदर गुन्हयाचे तपासात कोणत्याही स्वरूपाचा पुरावा उपलब्ध नसतांना फिर्यादीचे मोबाईल वर अज्ञात इसमाने फोन करून अपहरीत मुला बाबत विचारणा केली होती.
त्याबाबत पोलीस निरीक्षक मनोहर पाटील यांनी सुज्ञपणे फिर्यादीस सातत्याने चौकशी व मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून संशयीत आरोपी संतोष रामरूत शर्मा (वय २५ वर्षे रा. गावदेवी मंदिरा जवळ , बायपास रोड , मुंब्रा ता . जि . ठाणे) यास ताब्यात घेतले.
आरोपीने सदर मुलाचे अपहरण करून निर्मनुष्य असलेल्या पडक्या चाळीतील एका खोलीत नेवुन त्याचा गळा दाबुन जिवे ठार मारून त्याची ओळख पटू नये म्हणुन चेहरा दगडाने विद्रुप करून पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने सदरचे प्रेत खड्डा खोदून पुरून टाकले.
सदर गुन्हयात नमुद आरोपीस अटक करून त्याचे विरूध्द सबळ पुरावा गोळा करून सत्र न्यायालय ठाणे येथे मुदतीत दोषारोप पत्र सादर करण्यात आले होते. सत्र न्यायाधिश आर. आर. वैष्णव यांच्याकडे सदर गुन्हयाची सुनावणी होवुन सादर केलेल्या पुराव्यान्वये आरोपी विरूध्द गुन्हा शाबित झाल्याने आरोपीस जन्मठेप व ५ हजार दंड अशी शिक्षा सुनावली.
सदर तपासात पोलीस निरीक्षक मनोहर पाटील यांचे समवेत त्यांचे सहकारी पोलीस उप निरीक्षक शांताराम महाजन , सहा पोलीस उप निरीक्षक शंकर देसाई , सुभाष शेलार, रेश्मा गांगुर्डे अशा टिमने अथक प्रयत्न केले आहेत.
सदर गुन्हयाचे उत्कृष्ठ तपासाची केंद्र शासनाकडुन दखल घेण्यात येवुन १५ ऑगस्ट रोजा सर्वोत्कृष्ठ तपासी अधिकारी म्हणून केंद्रीय गृह मंत्री यांचे कडील विशेष तपास पदक पोलीस निरीक्षक मनोहर नरसप्पा पाटील उल्हासननगर गुन्हे शाखा घटक ४ यांना जाहीर झाले असुन त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.
देशभरातल्या 152 पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांचा केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे पदक देऊन गौरव करण्यात आला. यापैकी सर्वाधिक पदके महाराष्ट्राला मिळाले असून राज्यातील 11 अधिकार्यांचा गौरव करण्यात आला आहे.
पोलिसांमध्ये तपास कार्याबद्दल उच्च व्यावसायिक दृष्टीकोन निर्माण व्हावा तसेच उत्तम तपास कार्य करणाऱ्या पोलिसांच्या कार्याची दखल घेतली जावी, या हेतूने 2018 साली केंद्र सरकारने हे पुरस्कार सुरू केले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज