मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मुख्यमंत्री फडणवीस साहेबांवरती मराठ्यांचा विश्वास बसला आहे. त्यांनी तो ढळू देऊ नये एवढीच अपेक्षा आहे’ असे वक्तव्य मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलंय. जीआर ओके आहे, थोडाफार बिघडला तरी तो दुरुस्त करण्याची जबाबदारी सरकारने घेतली आहे.

पण तात्पुरता आनंद आपल्या जवळ जमत नाही. तुम्ही जीआर काढला त्याचा आम्ही कौतुक केलं. मात्र आता प्रमाणपत्र वितरित होणे गरजेचे आहे. असेही जरांगे पाटील म्हणाले.

एकीकडे जीआरमुळे ओबीसींना धक्का लागत नाही म्हणायचं, त्यांना खुश करायचं आणि इकडे मराठा समाजाला सांगायचं तुम्हाला जीआर दिला म्हणजे ते खुश. हे मतदाना पुरतं आहे. हे माझ्याजवळ चालत नसतंय. तात्पुरता आनंद आपल्याजवळ जमत नाही. प्रमाणपत्र वितरित होणे गरजेचे आहे. असेही जरांगे पाटील म्हणाले.।
दिवाळी, पाडवा, भाऊबीज झाल्यानंतर शेतकरी तज्ञांना बोलवून त्यांच्याशी चर्चा करू
शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारने दिलेला नुकसान भरपाईचानिधी आलाच नाही. शेतकऱ्यांवर संकट असताना त्यांना हातभार लावणे सरकारची जबाबदारी आहे. मात्र तात्पुरता आनंद देणारे हे सरकार आहे. 75 वर्षापासून हेच होतंय.

मात्र दिवाळी, पाडवा, भाऊबीज झाल्यानंतर शेतकरी तज्ञांना अंतरवालीमध्ये बोलवून त्यांच्याशी चर्चा करू. त्यानंतर राज्याची बैठक घेऊन पुढील शेतकऱ्यांच्या आंदोलनाची तारीख जाहीर करू. अशी महत्वाची माहिती मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिली.

रस्त्यावर येऊन सरकारचे कपडे फडावेच लागतील
रस्त्यावर येऊन सरकारचे कपडे फडावेच लागतील, त्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही. जसे 70 वर्षे गेले तसे आपल्या अनेक पिढ्या जातील. शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी आपण सर्वांनी आपला सन्मान सोडून द्यायचा आणिएकत्रयायचं, असे आवाहन देखील जरांगे पाटील यांनी केलंय.

कोणाच्या बापाचं जीआरला हात लावायला टप्पर नाही
“ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारची भूमिका ठाम असून, कोणाच्याही ताटातील वाटा काढून दुसऱ्याला दिला जाणार नाही,” अशी ग्वाही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. 2 सप्टेंबरचा शासन निर्णय न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे, त्यावर अधिक भाष्य करणे योग्य होणार नाही.
मात्र, हैद्राबाद गँझेटियर हे मराठवाडा आणि विदर्भ या भागापुरतेच लागू असून पश्चिम महाराष्ट्रातील मराठा कुणबी समाजाला त्याचा फायदा होणार नाही. त्यामुळे, ओबीसी नेत्यांनी गैरसमज करुन घेऊ नये, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान,याच मुद्दयांवर भाष्य करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले कि, बावनकुळे यांचे त्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी सर्वचालू आहे. ओबीसीचं त्यांना काही देणे-घेणे नाही. ओबीसी नेत्यांची राजकारणासाठी धडपड चालू आहे. हा जीआर कोणी रद्द करू शकत नाही, कोणाच्या बापाचं त्याला हात लावायला टप्पर नाही.
दरम्यान, 2 सप्टेंबरचा जीआरमुळे मराठवाड्यातील मराठा एक ना एक दिवस सगळा आरक्षणात जातो. बावनकुळे यांचे म्हणणं आहे कि पाच जिल्ह्यांसाठी जीआर, पण मराठवाड्यात पूर्वी पाचच जिल्हे होते ते आता आठ झाले. मराठ्यांनी दमा दमाने जावे, ही माझी अपेक्षा आहे. असेही ते म्हणाले.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










