टीम मंगळवेढा टाईम्स । सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की केंद्र सरकार शेतकऱ्यांना निम्म्या किंमतीला ट्रॅक्टर देत आहे? व्हायरल झालेल्या या वृत्तानुसार पीएम किसान ट्रॅक्टर योजनेंतर्गत सरकार शेतकऱ्यांना निम्म्या दराने ट्रॅक्टर देत आहेत.
या जाहिरातीनुसार सरकार प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजनेंतर्गत 5 लाख रुपये देत आहे. पीआयबी फॅक्ट चेक या भारत सरकारच्या अधिकृत ट्विटर हँडलने निम्म्या दराने ट्रॅक्टर देण्याची जाहिरात बनावट असल्याचे म्हटले आहे. केंद्र सरकारची अशी कोणतीही योजना नाही आहे.
दावा: केंद्र सरकार पीएम किसान ट्रैक्टर योजना के तहत आधे दाम में ट्रैक्टर मुहैया करा रही है।#PIBFactCheck : केंद्र सरकार द्वारा ऐसी कोई योजना नहीं चलाई जा रही। pic.twitter.com/0qTbN9KxgP
— PIB Fact Check (@PIBFactCheck) August 15, 2020
या पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजनेंतर्गत सरकार 5 लाख रुपये देत असल्याचा दावा या बनावट जाहिरातीमध्ये करण्यात आलेला आहे.जाहिरातीमध्ये पात्रता निकष व अर्जाची संपूर्ण माहितीसह या योजनेचा लाभ घेण्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र पीआयबी फॅक्ट चेकने त्याला बनावट जाहिरात म्हटले आहे.
केंद्र सरकार शेतीत युरियाच्या वापरावर बंदी आणणार आहे
काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल झाली होती की भारत सरकार आता शेतातील युरियाच्या वापरावर बंदी आणणार आहे. या दाव्याब्ररोबर वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तपत्राचे कटिंगही व्हायरल होत आहे.
‘आता सरकार शेतीत युरिया वापरणे बंद करेल’, वर्तमानपत्रामध्ये हे वृत्त प्रसिद्ध झाले. मात्र जेव्हा या बातमीच्या खरेपणाचा तपास केला गेला, तेव्हा इंटरनेटवर अशी कोणतीही बातमी आढळली नाही, ज्यामुळे भारत सरकार युरियाच्या वापरावर बंदी घालणार आहे याची पुष्टी होते.
पीआयबी फॅक्ट चेकने शेतीमध्ये यूरियावर बंदी आणणार असल्याचा हा दावा खोटा असल्याचे सांगताना ते म्हणाले, ‘हा दावा बनावट आहे! युरीयाचा शेतीत वापर करण्याबाबत भारत सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज