मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । लॉकडाऊनच्या काळात नागरिकांचे हाल होत आहेत . जिल्हा प्रशासन आणि पोलिसांमध्ये समन्वय दिसत नाही. या काळात पालकमंत्री दिलीप वळसे – पाटील गायब आहेत . सोलापूर जिल्ह्यासाठी तत्काळ नवा पालकमंत्री नियुक्त करावा , अशी मागणी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली आहे.
कोरोनामुळे लॉकडाऊन झाले आहे . सोलापूर शहरातील सर्व व्यवहार बंद झाले आहेत . महापालिका , रुग्णालये , अत्यावश्यक वस्तूंची सेवा देणारी दुकाने सुरु असल्याचे जिल्हाधिकारी सांगत आहेत . पण कुणाचा कुणाला ताळमेळ दिसत नाही . सरकारने मोफत गहू , तांदूळ , दाळ देतो म्हणून सांगितले . कुठे आहे धान्य ? लोकांच्या अडचणी कशा दूर होणार . लोक रस्त्यावर आल्यावर अडचणी दूर करणार काय ? सोलापूरच्या जनतेला लवकरात लवकर धान्य मिळाले पाहिजे . यासाठी पालकमंत्री दिलीप वळसे – पाटील यांनी नियमित बैठका घेतल्या पाहिजेत . पालकमंत्री सध्या कुठेच दिसत नाहीत . त्यामुळे या भागातील माहिती असणाऱ्या नेत्याला पालकमंत्री करा , अशी मागणी त्यांनी केली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज