टीम मंगळवेढा टाईम्स ।
देशात मार्च पासून चार मोठे बदल होणार आहेत. या बदलांचा थेट परिणाम तुमच्यावर होणार आहे. या नव्या नियमानुसार तुम्हाला आणखी एक दिलासा मिळणार आहे तर काही प्रमाणात नुकसानही होऊ शकते.
यामध्ये ज्येष्ठांना कोरोना लस, सरकारच्या ‘विवाद से विश्वास’ ची शेवटची तारीख, बँक ग्राहकांच्या IFSC कोड यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे.
आता यांना मिळणार कोरोना लस
भारतासह जगभरात कोरोनाविरोधात लसीकरण मोहीम राबवली जात आहे. ही मोहीम वेगाने सुरु आहे. या महामारीमुळे फक्त देशातील नाही तर जगाची चिंता वाढली आहे.
मात्र आता देशातील 60 वय वर्षांपेक्षा जास्त लोकांना येत्या मार्च महिन्यापासून कोरोनावरील लस दिली जाणार आहे.याशिवाय यामध्ये 45 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या पण गंभीर आजार असलेल्या नागरिकांनाही लस दिली जाणार आहे. पुरवठा आणि मागणी यानुसार हे लसीकरण केले जाणार आहे.
विवाद से विश्वास या योजनेची तारीख
भारत सरकारने विवाद से विश्वास या योजनेची तारीख वाढवली आहे. प्रत्यक्ष कर विवाद समाधान योजनेंतर्गत करसंबंधित घोषणा दाखल करण्यासाठी 31 मार्चपर्यंत कालावधी दिला आहे. याशिवाय फीसाठी 30 एप्रिलपर्यंत वाढ दिली आहे.
बँकांच्या IFSC कोडमध्ये होणार बदल
जर तुमचे अकाउंट बँक ऑफ बडोदामध्ये आहे तर तुम्हाला फायदा होईल. एक एप्रिल 2019 पासून विजया बँक आणि देना बँकेचे बँक ऑफ बडोदामध्ये विलीनीकरण झाले आहे. त्यामुळे आता हे सर्व ग्राहक बँक ऑफ बडोदाचे ग्राहक बनले आहेत.
या सर्व ग्राहकांना नवे IFSC कोड दिले जाणार आहे. एक मार्चपासून ग्राहकांना जुना IFSC कोड वापरता येणार नाही.
या शाळा उघडणार…
एक मार्चपासून उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांत पाचवीपर्यंतचे वर्ग सुरु होणार आहेत. हे विद्यार्थी ऑफलाईन शिक्षणासाठी शाळेत येऊ शकतात. त्यानुसार, शाळेनेही तयारी सुरु केली आहे. मात्र, या शाळांना कोरोनासंबंधी सर्व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
या’ बँकेच्या ATM मधून निघणार नाहीत 2 हजारांची नोट
सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन बँकेच्या कोणत्याही एटीएम मधून ग्राहकांना 2 हजार रुपयांची नोट मिळणार नाही आहे.
मात्र ग्राहक बँकेच्या काउंटवरुन 2 हजारांची नोट घेऊ शकतात. इंडियन बँकेने असे म्हटले आहे की, एटीएम मधून पैसे काढल्यानंतर ग्राहकांना 2 रुपयांचे सुट्टे मिळण्यासाठी बँकेत येतात. त्यामुळेच तत्काळ 2 रुपयांच्या नोटा एटीएम मधून दिल्या जाणार नाहीत.
टोल प्लाझावर मोफत मिळणार नाही FASTAG
नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) यांनी असे म्हटले आहे की, 1 मार्च पासून देशभरातील टोल प्लाझावर फास्टॅग खरेदी करण्यासाठी 100 रुपये शुल्क द्यावे लागणार आहेत. म्हणजेच 28 फेब्रुवारीनंतर मोफत फास्टॅग खरेदी करण्याची सुविधा बंद केली जाणार आहे.
एसबीआयच्या ग्राहकांसाठी KYC अनिवार्य
1 मार्च पासून स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआयच्या युजर्सला केवायसी (KYC) करणे अनिवार्य असणार आहे. असे न केल्यास खातेधारकांचे अकाउंट बंद केले जाणार आहे. यासाठी एसबीआय ग्राहकांना आपले अकाउंट अॅक्टिव्ह ठेवण्यासाठी केवायसी जरुर पूर्ण करावी.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज