पोलिसांनी घेतली लाच , उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यामार्फत चौकशी
टीम मंगळवेढा टाइम्स ।
अडवलेला अवैध वाळू वाहतुकीचा टेम्पो सोडण्यासाठी येथील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांनी ७० हजारांची लाच मागितली . तसेच दोघा व्यक्तींच्या समोर त्यापैकी ४० हजार रुपये घेतल्याच्या तक्रारीची पंढरपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांच्याकडे चौकशी दिली आहे . पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी त्यांना चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत .
अवैध वाळूची वाहतूक करणारी गाडी अडवून पोलीस कर्मचारी अजित मिसाळ व गणेश पवार यांनी ४० हजार रूपये घेतले असून या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची लेखी तक्रार मंगळवेढा येथील अजय बाळासाहेब नाईकवाडी (रा . हजारे गल्ली) याने पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली होती.
वाळू कारवाईवरून पोलिस कर्मचार्याला वाहनाखाली चिरडून मारल्याची घटना ताजी असताना चक्क वाळूवरील कारवाई टाळण्यासाठी दोघा पोलिस कर्मचाऱ्यांनी 70 हजार रुपये लाचेची मागणी करून 40 हजार रुपये स्वीकारल्या प्रकरणी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार करण्यात आली.
निवेदनाची प्रत पोलीस महासंचालक व विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे करण्यात आली.
याबाबतची तक्रार अजय बाळासाहेब नाईकवाडी रा.हजारे गल्ली यांनी केली असून यासंदर्भात दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, 11 ऑक्टोबर रोजी रात्री 12.30 वाजता अन्नपूर्णा हॉटेल ते दामाजी कारखाना पर्यंत ईरटीका या गाडीने पाठलाग करत वाळू वाहतूक करणारा टेम्पो अडवून 70 हजार रुपयांची मागणी केली एवढी रक्कम देणे शक्य नाही
म्हटल्यावर कारवाईची भीती दाखवली कारवाईची भीतीने पहाटे 4 वाजेपर्यंत रुपये 40 हजार रोख कॅश दोघा मित्राच्या साक्षीने दिली.
यासाठी स्थानिक पोलिस स्टेशन मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांची त्याला पाठबळ मिळत आहे. सदर कारवाई दरम्यान उपस्थित असलेले पोलिस कॉन्स्टेबल अजित मिसाळ यांची यापूर्वी पोलिस मुख्यालयात बदली झाली असतानाही
परंतु आर्थिक मिळगत चांगली असल्याने वसुलीसाठी तो मंगळवेढा येथे कार्यरत असून त्या कर्मचाऱ्यांची दहशत असून त्यांच्यावर कारवाई साठी कोणीही पुढे येत नसल्याने या कर्मचाऱ्यांपासून पोलीस संरक्षण मिळावे. अशी मागणी करत असल्यामुळे पोलिस खात्याची प्रतिमा मलिन होत आहे.
भीमा व माण नदीच्या खोऱ्यातील अवैध वाळू उपसा प्रकरणांमुळे चर्चेत असलेल्या परीसराबरोबर आता लाचखोरी प्रकरणामुळे पोलीसही पुन्हा चर्चेत आले.(स्रोत:सकाळ)
चुकीची तक्रार करणाऱ्यांवर देखील कारवाई होणार
यासंदर्भातील तक्रार आपल्याकडे आली नसून तक्रार प्राप्त झाल्यानंतर यावर चौकशी करून जे दोषी आहेत त्यांच्यावर योग्य कारवाई केली जाईल. शिवाय चुकीची तक्रार करून पोलिसांचे मनोबल खच्चीकरण करण्याचे प्रयत्न केल्यास त्याच्यावरही कारवाई केली जाईल – ज्योतीराम गुंजवटे, पोलिस निरीक्षक
पंढरपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांच्याकडे चौकशी
अडवलेला अवैध वाळू वाहतुकीचा टेम्पो सोडण्यासाठी येथील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांनी ७० हजारांची लाच मागितली . तसेच दोघा व्यक्तींच्या समोर त्यापैकी ४० हजार रुपये घेतल्याच्या तक्रारीची पंढरपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांच्याकडे चौकशी दिली आहे . पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी त्यांना चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत .
पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी याप्रकरणी माझ्याकडे चौकशी दिली आहे . शनिवारी हा आदेश मिळाला आहे . या घटनेची चौकशी केली जाईल . निरपराध व्यक्तींवर अन्याय होणार नाही . निःपक्ष चौकशी करून आहवाल देण्यात येईल – विक्रम कदम, उपविभागीय पोलिस अधिकारी, पंढरपूर
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज