मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । एका तरुणावर टवाळखोरांनी धारदार शस्त्राने सपासप वार करून निर्घृण खून केला. ही गंभीर घटना संग्रामनगर उड्डाणपूल येथील म्हाडा कॉलनीतील मैदानावर सोमवारी (ता. १६) रात्री नऊ ते साडेनऊच्या सुमारास घडली. मोबाईल देण्यास नकार दिल्याने खून करण्यात आल्याचे समोर येत आहे.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, अक्षय प्रधान (२२, रा. परभणी) असे मृताचे नाव असून, तो औरंगाबादेत स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी आई व बहिणीसह राहत होता. अक्षय हा एकुलता एक असून, त्याला वडील नाहीत. स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने अक्षय एका मित्राला भेटण्यासाठी दुचाकीने संग्रामनगर उड्डाणपुलाजवळच्या म्हाडा कॉलनीत आला होता.
मोटारसायकलवरील एकाने अक्षय प्रधान याला ‘तुझा मोबाईल दाखव’ म्हणत त्याच्या हातातून मोबाईल घेण्याचा प्रयत्न केला. अक्षयने मोबाईल देण्यास नकार दिल्यावर तिथे त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर दोघांनी अक्षयच्या पाठीवर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात अक्षय रक्तबंबाळ झाला. नंतर मारेकरी फरारी झाले. रक्तबंबाळ अवस्थेत अक्षय जिवाच्या आकांताने पळत सुटला. म्हाडा कॉलनीच्या मैदानापासून साठ ते ऐंशी फूट आल्यानंतर कॉलनीतील एका रस्त्यावर तो धाडकन पडला.पोलीस अधिक तपास करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज