मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
दुष्काळ, महापुरासह अन्य नैसर्गिक आपत्तीतून बाहेर पडत असतानाच आता बळीराजाच्या मुलांना ऑक्टोबरमध्ये परीक्षा शुल्क वाढीला सामोरे जावे लागणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने 10 टक्के शुल्क वाढीचा निर्णय घेतला असून त्यावर 25 फेब्रुवारीला होणाऱ्या बैठकी शिक्कामोर्तब होणार आहे.
सर्वाधिक साखर कारखान्याचा जिल्हा, शेती हा प्रमुख व्यवसाय असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील बळीराजाला विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनल्याने मुलांच्या शिक्षणाचा खर्च करणे कठीण झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असतानाच रोजगाराचा शोध घ्यावा लागत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना ऑक्टोबरमध्ये परीक्षा वाढीला सामोरे जावे लागणार आहे. मागील दोन वर्षात परीक्षा शुल्कात वाढ केली नसल्याने आता परीक्षा शुल्क वाढविले जाणार आहे. दरम्यान, परीक्षा शुल्कात दोन वर्षे वाढ करु नये, अशी मागणी युवा सेनेचे शहराध्यक्ष विठ्ठल वानकर यांनी केली असून ते कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांना निवेदन देणार आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज