मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मोहोळ तालुका मिरी या गावातून सन २०१८ – २०१९ या कालावधीत भीमा नदी पात्रातून वाळू माफीयांनी रात्रंदिवस बेसुमार ट्रक, ट्रक्टर ,फोकलेन मशिनच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा केला असल्यामळे गावाच्या रस्त्याचे खुप मोठया प्रमाणात लाखो रुपयाचे नुकसान झाले असून रस्त्याचे काम दोन दिवसात चालू न झाल्यास संबंधिताच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचीका दाखल करण्याचा इशारा सामाजीक कार्यकर्ते शरद विठ्ठल कोळी यांनी दिली आहे.
सध्या उसाचा सिझन असल्यामुळे वरील शेतकरी बांधवाचा ऊस अनेक कारखान्याना गाळपासाठी जात आहे. या कारखान्यास जात आहे . शेतकऱ्यांच्या शेतात तोडून ठेवलेला ऊस रस्त्याच्या खड्डयामध्ये ट्रक ट्रक्टर बैलगाडीतील ऊसन दिवसभर वाळूजावून जवळपास शेतकऱ्याचे एकरा जमिन १२ ते १५ टनाचे जवळ पास ४० हजार रुपया शेतकऱ्याचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे .
वाळू वाहतूक करण्यासाठी वाळू माफीयाना ठेका देण्यात येतो त्यावेळेस आपण रस्त्याची जबाबदारी त्यांचेवर सोपवली जाते. त्यांच्याकडून लेखी स्वरुपात घेतलेले असते मग या रस्त्याना शेतकऱ्याच्या नुकसानीला नेमके कोण जबाबदार आहे ? हे रस्ते अवेद्य वाळू वाहतूक केल्यामुळे मोठ मोठे रस्ते उध्दवस्त झालेले आहेत.
सबंधीत वाळू ठेकेदार यांच्याकडून किंवा संबंधीत अधिका – याला तात्काळ रस्ते दुरुस्त करण्याचा आदेश देवून दोन दिवसामध्ये रस्त्याचे काम सुरु करण्यात यावे . रस्तेचे चागल्या प्रकारे काम करुन शेतकऱ्याना शेतातील ऊस वेळेवर गाळप करण्यासाठी पोहाचवण्यासाठी मदत करावी
रस्त्यात खड्डेपडल्याने शाळेत जाणाऱ्या येणाऱ्या मुलाना वेळेत जाता येत नाही वेळेत वाहन उपलब्ध होत नाही.वेळेवर मुली शाळेत पोहचत नसल्याने व वेळेवर घरी येत नसल्याने काही पालकानी मुलींची बंद केली याचा देखील गांभीर्याने विचार करावा असे लेखी तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयात दिली आहे.
दरम्यान अवैध वाळू उपसामुळे रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्यामुळे ऊसवाहतुक करणाऱ्या बैल खडयात पाय जावून पाय मोडलेले, खड्डयात पडून शिंग मोडलेले. खड्डयात पडून बैलाचे प्राण गेले आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज