मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
सोलापूर जिल्ह्यातील शेतकर्यांना ऑनलाईन सात/बारा उतारा मिळावा यासाठी शासनाच्या आदेशाप्रमाणे डिजिटल सहीचे ऑनलाईन उतारे थेट शेतकर्यांना देण्यासाठीचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे गेल्या तीन वर्षांपासून प्रशासनाच्यावतीने वारंवार सांगण्यात येत आहे. डिजिटल उतार्याचे 97 टक्के काम पूर्ण झाले असून केवळ 3 टक्क्यासांठी घोडे अडले आहे. शेतीचा सात/बारा ऑनलाईन मिळत नसल्याने शेतकर्यांना तलाठ्यांकडे हेलपाटे मारवे लागत आहेत.
राष्ट्रीय भूमिअभिलेख कार्यक्रमांतर्गत डिजिटल सिग्नेचर पूर्ण करण्यासाठी डिसेंबर 2019 पर्यंत मुदत देण्यात आली होती.
तलाठी मात्र आपली फी दिल्याशिवाय कोणत्याही उतार्यावर सही करत नाहीत. त्यामुळे शेतकर्यांना याचा त्रास सहन करावा लागत असल्याची ओरड शेतकरी करत आहेत. शहरालगत आणि पंढरपूर, बार्शी या शहरातील काही जमिनींच्या तक्रारी असल्याने तसेच सात/बारा उतारे जुळत नसल्याने या भागातील काम अपूर्ण असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे. त्यामुळे याठिकाणी असणारे क्षेत्र आणि उतारे जुळले की जिल्ह्यातील शंभर टक्के ऑनलाईन सात/बारा उतार्याचे काम पूर्ण होईल, असा विश्वास जिल्हा प्रशासनाच्यावतीने व्यक्त करण्यात आला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज