मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये पीकविमा घेण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होत आहे . यातून कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना विमा मिळणेही गरजेचे आहे . गर्दी टाळण्यासाठी सोसायट्यांमार्फत घरपोच विमा मिळण्याची सोय करण्याची मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी माजी मंत्री दिलीपराव देशमुख व जिल्हा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जाधव यांच्याकडे केली.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून देशासह राज्यात लॉकडाउन करण्यात आला आहे . यात खरीप हंगामातील पिकांसह रब्बी पिकांचे नुकसान झालेले शेतकरी अडचणीत सापडले आहेत . खरिपाचा विमा मंजूर झाला आहे . कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता शेतकरी पैशासाठी बँकांम ध्ये गर्दी करीत आहेत . यातून कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती आहे.
ही गर्दी टाळण्यासाठी बँकांमधून पैसे देण्याऐवजी गावच्या सोसायटी चेअरमनच्यावतीने शेतकऱ्यांना पैशांचे वाटप केल्यास कोरोनाचा धोका दूर होईल.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज