मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । उजनीच्या पाण्यामध्ये नायट्रेड, क्लोराईड, ऑसायनिक, कॅडिनियम, क्रोमियम, कॉपर, निकेल, झिंक, मक्र्युरी इत्यादी जड वस्तू आढळून आल्या आहेत. हे पाणी पिल्यामुळे नागरीकांना कॅन्सर सारख्या गंभीर आजाराला सामोरे जावे लागत असून व या पाण्याच्या जडत्वामुळे गर्भवती महिलांवर वाईट परिणाम होत आहेत.
पुणे जिल्ह्यातील महानरपालिका, नगरपालिका व औद्योगिक वसाहतीमुळे उजनी धरणात सर्वाधिक प्रदुषित पाणी येत असून हेच पाणी सोलापूर जिल्ह्यातील नागरिक पिण्यास वापरत आहेत. पाणी प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी धोरण ठरवावे अशी मागणी आमदार प्रशांत परिचारक यांनी विधानपरिषदेत केली.
यावर पर्यावरण विभाग व नगरविकास विभाग तातडीने बैठक घेणार असल्याचे आश्वासन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत दिले.पुणे जिल्ह्यातील पुणे-पिंपरी चिंचवड या दोन मोठ्या महानगरपालिका व ८ ते १० नगरपालिका तसेच नदीकाठची अंदाजे २०० गावे, ८ ते १० गावातील औद्योगिक वसाहती यांच्यामधून भीमा नदीच्या पात्रामध्ये उगामापासून प्रदुषण केले जात आहे. गेल्या अनेक वर्षापासून उजनी धरणाच्या पाण्याची गुणवत्ता ही खालावत आहे. तेच प्रदुषित पाणी उजनी धरणाच्या खालच्या भागातील सोलापूर महानरगपालिका, नगरपालिका आणि नदीकाठची असणारी गावे, ग्रामपंचायत यांना या उजनी धरणामधून पाणी पुरवठा केला जातो.
या उजनीच्या पाण्यामध्ये पुणे जिल्ह्यातून येणारे मैला युक्त सांडपाणी तेथील कारखान्याचे सोडणारे रसायनयुक्त पाणी, साखर कारखान्याची मळी आदींमुळे दुषित झालेले पाणी नागरीकांना व जनावारांना पिण्यासाठी पुरविले जाते. सोलापूर शहरामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा गंभीर आहे. नदीपात्रातील वाळुच्या उपशामुळे नैसर्गिकरित्या पाणी शुध्द करण्याचे प्रमाण कमी झालेले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज