मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
दुकानासाठी माहेरहून आई वडिलांकडून पैसे घेऊन ये म्हणून पती व सासूसह दोन ननंदाकडून विवाहितेस जाचहाट होत असल्याची घटना संग्रामनगर अकलूज ता . माळशिरस येथे घडली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी ,अजनाळे येथील वर्षा व संग्रामनगर अकलूज ता . माळशिरस येथील पृथ्वीराज उमराव देशमुख यांचा सुमारे चार ते पाच वर्षांपूर्वी विवाह झाला होता.यानंतर अवघ्या काही दिवसातच ५ फेब्रुवारी २०१६ पासून ते १८ फेब्रुवारी २०१९ पर्यंत आई – वडिलांकडून आपल्या दुकानासाठी पैसे घेऊन ये , तू आमच्या घराचे वाटोळे केले आहे असे म्हणून शिवीगाळ करून वर्षा पृथ्वीराज देशमुख या विवाहितेस पती पृथ्वीराज उमराव देशमुख सासू भारती उमराव देशमुख दोघेही रा .संग्रामनगर अकलूज तसेच नणंद विद्या संतोष शेबडे व धरती धर्मराज देशमुख या चौघांनी पैशाच्या कारणावरून विवाहितेचा छळ केला . सासरी पैशासाठी छळ होत असल्याने वर्षा देशमुख या माहेरी अजनाळे येथे राहत आहेत.
याबाबत वर्षा देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास पो . ना . भोसले करत आहेत .
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज