मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
वरुड (ता.खटाव) येथील शेतकऱ्याचा अंगावर विजेची तार पडून शॉक बसल्याने मृत्यू झाला.हा शेतकरी शेतात पाणी देत असताना ही घटना घडली. उत्तम बळीराम जाधव ( वय ५२ ) असे मरण पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
वरूड येथील शिवाजीनगर नजीक असणाऱ्या शेरी शिवारात उत्तम जाधव दुपारी शेतातील पिकास पाणी पाजत होते . त्याचवेळी शेतावरून गेलेल्या विजेच्या तारांपैकी एक तार अचानकपणे तुटून उत्तम जाधव यांच्या अंगावर पडली . त्यांना विजेचा शॉक बसला.
त्याठिकाणी असणाऱ्यांनी त्यांना सोडविण्यासाठी बांबूच्या साह्याने प्रयत्न केले . मात्र , सर्व प्रयत्न निष्फळ ठरले . या घटनेची नोंद औंध पोलीस ठाण्यामध्ये झाली असून , अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज