मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
कर्जत येथील तुरुंगात गंभीर गुन्ह्यात अटकेत असलेले पाच आरोपी पळून गेले. विशेष म्हणजे ही घटना सायंकाळी साडेसात ते आठच्या सुमारास घडली. कडेकोट सुरक्षा व्यवस्था असतानादेखील आरोपी पळून गेलेच कसे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
खुनाच्या गुन्ह्यात होते अटकेत
या बाबत मिळालेल्या माहितीनुसार तुरुंगरक्षक जालिंदर माळ शिखरे हे तपासणी करीत चार नंबरच्या कोठडीत गेले होते. त्यावेळी त्यांना पाच आरोपी जेलमध्ये नसल्याचे दिसले. त्या कोठडीत एकूण नऊ आरोपी होते. पळून गेलेले आरोपी खून, बेकायदेशीर शस्त्र या सारख्या विविध गंभीर गुन्ह्यात अटकेत होते.
जामखेड-कर्जतचेच आहेत आरोपी
पळून गेलेले आरोपीपैकी काहीजण हे जामखेड तालुक्यातील नान्नज, कवडगाव, अरणगाव, पारेवाडी व म्हाळंगी येथील असल्याचे समजते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज