

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथील भीमा नदीपात्रात बुडणाऱ्या सहा जणांना माजी सरपंच सुनील पाटील यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता वाचवले.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: 7588214814
रविवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास ही घटना घडली . त्यामुळे देव तारी , त्याला कोण मारी ! या म्हणीचा प्रत्यय आला . बुडणारे हे मुंबईचे पर्यटक होते . माचणूर येथे भीमा नदी तुडुंब भरून वाहत आहे . येथे पर्यटक श्री सिद्धेश्वराच्या दर्शनासह परिसर पाहण्यासाठी येतात रविवारी दुपारी आठ तरुण बंधाऱ्याजवळ नदीपात्रात उतरले.
पाण्याचा अंदाज आल्याने प्रवाहात पुढे सरकताना सहाजण नदीपात्रात मध्यभागी गेले . ते बुडत असल्याचे बंधाऱ्यावरून निघालेले माजी सरपंच सुनील पाटील यांनी पाहिले . तत्काळ त्यांनी पाण्यात उडी घेतली .एकामागून एक अशा पाचही जणांना पाण्यातून बाहेर काढले .
दरम्यान,नदीपात्रात मध्यभागी असलेल्या पाच जणांना बाहेर काढताना पाटील यांचीही दमछाक झाली . ताण आल्याने त्यांची प्रकृती बिघडली . त्यामुळे ते दिवसभर घरी झोपून होते .आतापर्यंत त्यांनी अनेकांना वाचवले असुन त्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे प्रचंकोशीमध्ये त्यांचे कौतुक होत आहे.






बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












