मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख नद्यातून होणारी वाळू चोरी रोखण्यासाठी महसूलची विशेष पथके नियुक्त करण्याचा विचार असल्याची माहित अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी दिली.
भीमा व सीना नदीत पाणी असल्याने येत्या दोन महिन्यात वाळू लिलाव होण्याची शक्यता नाही असे स्पष्टीकरण अतिरिक्त जिल्हाधिकारी जाधव यांनी यावेळी दिले. वाळूचे लिलाव नसल्याने तस्कारांची लॉबी सक्रीय झाली आहे. त्यामुळे सोलापूर व जिह्यातील इतर मोठ्या शहराभोवती मोठ्या प्रमाणावर वाळू तस्करी सुरु झाली आहे.
यामध्ये मंगळवेढा,पंढरपूर , माळशिरस , माढा , मोहोळ , दक्षिण सोलापुरात हे प्रमाण जास्त आहे . सोलापूर शहराकडे येणाऱ्या रस्त्यावर नाकेबंदी करण्याचा प्रस्ताव आहे. सध्या पोलिसांकडून वाळू चोरीवर कारवाई करण्यात येत आहे . पण पोलिसांची पथके कारवाईसाठी जात असताना तस्कारांना माहिती मिळत असल्याचे चित्र दिसत आहे . त्यामुळे वाळू तस्कर अधिकच सक्रीय झाल्याचे दिसून येत आहेत.त्यामुळे आता ही कारवाई पोलिसांबरोबर महसूल , आरटीओ यांच्या संयुक्त मोहीमेतून आणखी तीव्र करण्याचा विचार सुरू आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज