मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन।
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानभवनात ‘मराठी भाषा दिन’ कार्यक्रमात मराठी भाषेची परंपर, संस्कृती, वारसा आणि जतन यावर भाष्य केलं. तसेच ‘भाषा संस्कारांतून जन्माला येते. जिजाऊंचे संस्कार असलेली आपली मराठी भाषा आहे. ही शक्ती आणि भक्तीची भाषा आहे. चिंतीत भावनेनं मराठी भाषा दिन साजरा करू नका,” असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं.
तसेच या कार्यक्रमाला देवेंद्रजीही उपस्थित आहेत, सर्वपक्ष एकत्र येऊन आपल्या आईचा सन्मान करत आहेत याचा मला आनंद असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांवर संस्कार करणाऱ्या जिजाऊंची भाषा ही मराठी आहे. ज्या संस्कारातून स्वराज्य उभारलं तीच भाषा मराठी आहे.
मराठी भाषेचं काय होणार याची चिंता करण्याचं कारण नाही. मराठीचं कुणीही काही वाकडं करू शकणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. ते पुढे म्हणाले, मराठीवर प्रेम म्हणजे इंग्रजीचा विरोध नाही. इंग्रजीवर प्रभुत्व मिळवूनही मराठीवर प्रेम करू शकतो. मराठी भाषा प्रचिन आहे का याचे आज पुरावे द्यावे लागतात हे दुर्दैवी आहे असंही त्यांनी सांगितलं.
पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘मी शाळेत असताना माझी आई पाटीवर अ आ इ ई गिरवून घेत होती, असंही ते म्हणाले. मराठी भाषा ही शुद्ध बोलली गेलीच पाहिजे, तशी ती शुद्ध लिहिलीही गेली पाहिजे. माझ्या आजोबांचा कटाक्ष होता की मराठी भाषा ही ऱ्हस्व दीर्घाप्रमाणेच उच्चारली गेली पाहिजे,” असंही त्यांनी आपल्या आजोबांची आठवण काढताना मुख्यमंत्री ठाकरेंनी सांगितलं.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज