मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
राज्यातील १९ जिल्ह्यांतील सुमारे १ हजार ५७० ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच व सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २९ मार्च रोजी मतदान होणार आहे.
तर , दुसऱ्या दिवशी ३० तारखेला मतमोजणी होईल . सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या : ठाणे १३ , रायगड १ , रत्नागिरी ८ , नाशिक १०२ , जळगाव २ , अहमनगर २ , नंदुरबार ३८ , पुणे ६ , सातारा २ , कोल्हापूर ४ , औरंगाबाद ७ , नांदेड १०० . अमरावती ५२६ . अकोला १ . यवतमाळ ४६१ , बुलडाणा १ , नागपूर १ , वर्धा ३ , आणि गडचिरोली २९६ . या निवडणुकीसाठी ६ ते १३ मार्च या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज