मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोना व्हायरसमुळे ईराणने आंतरराष्ट्रीय हवाई सीमा बंद केली आहे. शिवाय सर्व विमानसेवा बंद केल्यामुळे माळशिरस तालुक्यातील अकलूजसह परिसरातील तीर्थयात्रेसाठी गेलेले १२ प्रवासी कूम-तेहरानमध्ये अडकले आहेत. ते घाबरलेले आहेत.
कोल्हापूर येथील साद टूर सफर या कंपनीने २१ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान इराणमध्ये सहल आयोजित केली होती. अकलुजमधील यासीन अली नदाफ,इस्माईल गुलाब मुजावर आदी १२ यात्रेकरू २१ फेब्रुवारीला मुंबईहून रवाना झाले होते. या प्रवासासाठी भारतातून १ हजार ८०० यात्रेकरू गेले आहेत.
त्यामध्ये दिल्लीहून १ हजार २०० तर इतर ठिकाणावरील ६०० यात्रेकरू असून, कोल्हापूरच्या साद टूर्स सफर कंपनीकडून ४४ यात्री गेले आहेत. कंपनीचे मालक मुन्नाभाई शेख हे स्वत: ४४ यात्रीसोबत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज