मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
26 जानेवारीला वांगी गावच्या ‘रुक्मिणी औंधे’ यांचे निधन झाले. काल सकाळी 12 वाजल्यापासून हे मयत दफन करण्यासाठी हक्काची जागा मिळण्याची वाट बघत आहे. तहसीलदार आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र अजूनही अंत्यसंस्कार विषयी निर्णय घेतला नाही. स्मशानभूमीच्या जागेवरून दोन समाजात वाद आहे. यामुळे इथं अंत्यसंस्कार करू दिले जात नाहीत, असा ग्रामस्थांचा आरोप आहे.
कडेगाव तालुक्यातील वांगी तालुका येथे गट नंबर 1599 आणि 2469 मध्ये गेले 200 वर्षापासून वंश परंपरागत दफन केले जाते. तसेच सात बारा खाते उतऱ्यावरती पीक पाणी मध्ये 12 गुंडे स्मशान पड अशी नोंद आहे. परंतु शब्दाची गल्लत करून त्या हक्काच्या जागेबाबत, काही लोकांचा विरोध आहे.
आज 26 जानेवारी वांगी गावचे माजी सरपंच रामभाऊ औंधे यांच्या सुविद्य पत्नी रुक्मिणी औंधे यांचे निधन झाले.त्यांच्या बाबतीत ही हाच प्रकार घडत आहे.सकाळी 12 वाजल्यापासून हे मयत दफन करण्यासाठी हक्काची जागा मिळण्याची वाट बघत आहे.परंतु प्रजासत्ताक दिनी सुध्दा प्रशासन ला अजून हि जाग आली नाही. सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजित साहेब यांनी फोन वरून स्थानिक प्रशासनाला आदेश दिले आहेत, मात्र स्थनिक प्रशासनाने अजून कोणताच निर्णय घेतला नाही. तहसीलदार याना आदेश दिले असून, लोकांशी चर्चा करून सांमजशाने मार्ग काढला जाईल, आणि अंत्यसंस्कार होतील अस, जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी सांगितलं आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज