मंगळवेढा टाइम्स वृत्तसेवा:-
जिल्ह्यात शनिवारी (दि. 8) दोन घटनांत तीन शेतकर्यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. मेशी (ता. देवळा) व देवळाली कॅम्प येथे या दुर्दैवी घटना घडल्या. मेशी येथे दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला.
मेशी येथे शनिवारी (दि. 8) सकाळी 11 वाजता घडली.
विहिरीतील विजेचा पंप सुरू करण्यासाठी तरुण शेतकरी संदीप नानाजी शिरसाठ (31) गेला असता त्याला मोटारीच्या लोखंडी पेटीला उतरलेला शॉक लागल्याने तो ओरडला असता त्याला वाचविण्यासाठी गेलेला भूषण ऊर्फ मनोज रमेश शिरसाठ (23) याचादेखील मृत्यू झाला. यावेळी कृष्णा उत्तम शिरसाठ हादेखील मदतीला धावला होता.
यावेळी कृष्णा शिरसाठ हा धावला असता तो फेकला गेल्याने जखमी झाला. मात्र, कृष्णा याने तत्काळ आजूबाजूच्या लोकांना कळविले. त्यामुळे नागरिकांनी रुग्णवाहिका बोलावून या तिघांना देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी डॉक्टरांनी संदीप आणि भूषण यांना ) मृत घोषित केले, तर जखमी कृष्णा शिरसाठ यांना मालेगाव येथील खासगी दवाखान्यात हलविण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, संदीप शिरसाठ यांचा आठ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. अतिशय गरीब परिस्थिती असल्याने कष्ट करून तो कुटुंबाची उपजीविका भागवत होता. संदीप यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, भाऊ आणि भावजय असा परिवार आहे. तर भूषण हा एकुलता एक असून, देवळा महाविद्यालयात शिक्षण घेत होता.
देवळाली कॅम्पलाही शेतकर्याचा मृत्यू
भगूर रोडवरील शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या संसरी गावातील शेतकरी संजय रामदास गोडसे (47) यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. संजय गोडसे यांना उपचारासाठी कॅन्टोन्मेंट रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. वीज मंडळाच्या दुर्लक्षामुळेच हा अपघात झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज