टीम मंगळवेढा टाईम्स ।
राष्ट्रीय महामार्गाचे शेकडो शेतकऱ्यांचे पैसे अद्याप प्रशासनाच्या बोटचेपी भूमिकेमुळे मिळाले नसल्यामुळे प्रहार संघटनेने प्रांत कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून तातडीने शेतकऱ्यांचे पैसे वर्ग करावेत अशी मागणी समोर येत आहे.
मंगळवेढा तालुक्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ बाधित शेतकऱ्यांना त्वरित मोबदला मिळावा ज्या शेतकऱ्यांनी कागदपत्रे जमा करूनही सह्या करूनही नऊ महिने झाले. तरी मोबदला मिळत नाही.
भुमिअभिलेख ने शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे तर काही शेतकऱ्यांकडून टक्केवारी स्वरूपात पैसे घेऊन गायरान जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना दिला आहे. त्याची चौकशी व्हावी,
जमिनीची मोजणी योग्य करून शेतकऱ्यांना मोबदला द्यावा, जनावरांचे गोठे काढले, पाईपलाईनचे नुकसान केले रस्ता निकृष्ट दर्जाचा केला आहे.
तर त्या कंपनीवर कारवाई व्हावी, ज्या शेतकऱ्यांच्या सह्या झालेल्या आहे. त्या शेतकऱ्यांना त्वरित मोबदला द्यावा, अशा अनेक मागण्या सहित प्रहारचे सदस्य व शेतकरी उपोषणास बसले आहेत.
जोपर्यंत शेतकऱ्यांना मोबदला मिळत नाही, तोपर्यंत प्रहार माघार घेत नाही , अशी कठोर भूमिका प्रहार चे जिल्हा उपाध्यक्ष सिदराया माळी व तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे यांनी घेतली आहे.
यावेळी अँड.नंदकुमार पवार, प्रहारचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख नविद पठाण, तालुका उपाध्यक्ष रोहिदास कांबळे, शहराध्यक्ष आनंद गुंगे, तालुका उपाध्यक्ष जयंतकुमार ठेंगील, वेताळ मुरडे , विवेक कुंभार ,मारुती डोके , बाळासाहेब डोके , राम बंडगर , नामदेव बंडगर , उत्तम सरडे, पांडुरंग लेंडवे उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज