मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । लॉकडाऊनच्या काळात जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी शेतकऱ्यांसाठी मंगळवारी मोठा निर्णय घेतला आहे. शेती मालाच्या वाहतुकीला पूर्णपणे मोकळीक दिली असून, कृषी बियाणे, खते, औजारे विक्री व दुरूस्तीची दुकाने आता पूर्णवेळ उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.
पावसाळा तोंडावर आहे. त्यामुळे शेतकºयांची कामे कामे वेळेत पूर्ण होणे गरजेचे आहे अशी मागणी होत होती. याचा विचार करून राज्याच्या मुख्य सचिवांनी लॉकडाऊन काळात कृषी उत्पादन, वितरण व वाहतुकीबाबत मुक्त परवानगी द्यावी व शेतीमालाच्या विक्रीबाबत आवश्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार जिल्हाधिकारी शंभरकर यांनी मंगळवारी दुपारी कृषी उत्पादन, वितरण व वाहतुकीच्या मुक्त परवानगीबाबत विशेष आदेश जारी केला.
अशा आहेत नियम व अटी
लॉकडाऊनमध्ये आता शेतीमालाची किरकोळ विक्री, विविध यंत्रसामुग्री व उपकरणांच्या विक्रीला परवानगी देण्यात येत आहे. शेतातील कापणी व पीक काढणीनंतरची प्रक्रिया, पेरण आणि इतर कामांसाठी मजुरांची वाहतुकीला परवानगी देण्यात येत आहे. सर्व कृषी सेवा केंद्र, यंत्र दुरूस्तीची दुकाने पूर्णवेळ सुरू राहतील.
कृषी व कृषीपूरक उद्योगासाठी लागणारे मजूर, कर्मचारी, दुकानदारांसाठी कृषी अधिकारी पास देतील व हा पास पोलीस ग्राह्य धरतील. दुकाने सुरू, शेतीमालाची वाहतूक व कामासाठी मजूर लावताना फिजीकल डिस्टन, मास्क वापरणे बंधनकारक राहणार आहे.
———————-
ब्रेकिंग व नवनवीन ताज्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज