मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । देशात कोरोना व्हायरसचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. महाराष्ट्रात तर परिस्थिती फारच अवघड होताना दिसत आहे. गुरुवारी दिवसभरात दुसऱ्या मृत्यूची नोंद झाली आहे तर देशभरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढून 125 झाली आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे
7 वर्षे किंवा त्याहून कमी शिक्षेस पात्र असलेल्या राज्यातील 60 तुरूंगांतील जवळ-जवळ 11 हजार कैदींना तातडीने पॅरोल देण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत. पुढील आठवड्याभरात या निर्णयावर कार्यवाही होणार आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीटद्वारे दिली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज